एक्स्प्लोर
आठ दिवसांपासून अवकाळीने झोडपले, नंदुरबारमध्ये फळबागांना मोठा फटका, शेतकरी हतबल Photos
अवकाळी पावसानं नंदूरबारमध्ये चांगलंच झोडपलं आहे. पावसानं फळबाळांना मोठा फटका बसला आहे

nandurbar rain
1/5

नंदुरबार जिल्ह्यात देखील गेल्या आठ दिवसापासून रोज अवकाळी पाऊस येत असल्याने जिल्ह्यात प्रचंड नुकसान होत आहे.
2/5

गारपिटीसह पडलेल्या पावसामुळे ३ एकर टरबूज पीक पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. या पिकासाठी शेतकऱ्याने सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.
3/5

मात्र अवकाळी पावसामुळे संपूर्ण मेहनत वाया गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याच्या पाच लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड अडचणीत आली आहे.
4/5

गावातील इतर शेतकऱ्यांचेही काही प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण आहे.
5/5

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे जगणे अधिक कठीण होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
Published at : 14 May 2025 03:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
व्यापार-उद्योग
क्राईम