एक्स्प्लोर
Beed News: बदलत्या हवामानाचा परिणाम,शिमला मिरचीच्या पिकावर बोकडा व्हायरसचे संकट; शेतकर्याचे टोकाचे पाऊल
Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने (Rain) एकाच दाणादाण उडवली आहे.

Maharashtra Weather Update
1/6

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने (Rain) एकाच दाणादाण उडवली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकर्यांना बसला असून हाता तोंडाशी आलेला घास पाण्यात वाहून गेला आहे. या हवामान बदलाचा परिणाम अनेक पिकांवर झाला असून बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे.
2/6

अशीच काहीशी परिस्थिती बीडच्या पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातील शेतकाऱ्यावर ओढवली आहे. यात त्यांनी तब्बल 200 एकरवर शिमला मिरची लागवड केली होती. मात्र हवामान बदलाचा परिणाम थेट या पिकावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
3/6

अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे शिमला मिरचीच्या पिकावर बोकडा व्हायरसचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
4/6

यामुळे 80 टक्के पिकाचे नुकसान झालंय. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली असून पिकांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याची माहिती आहे.
5/6

जिल्ह्याच्या दासखेड गावातील शेतकरी गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिमला मिरचीची लागवड करत आहे. मात्र हवामान बदल आणि बोकडा व्हायरसमुळे पिकांचे नुकसान होत आहे.
6/6

परिणामी, संतप्त शेतकर्याने संतापून आपल्या शेतातील शिमला मिरचीची लागवड उपटून फेकण्याचा निर्णय घेतला आहे.
Published at : 24 May 2025 01:57 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
राजकारण