एक्स्प्लोर

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच पाचही वर्षात वीजदर कमी होणार

वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरवण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला आहे.

मुंबई : वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरवण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश दिला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच वीजदरात कपातीचा प्रस्ताव महावितरणकडून सादर झाला आणि आयोगाने आगामी पाचही वर्षात वीजदर कमी करण्याचा आदेश दिला आहे.

स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी दहा टक्के अतिरिक्त टीओडी सवलत आणि सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन ही या आदेशाची वैशिष्ट्ये आहेत. राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केल्यामुळे साडेसात एचपीपर्यंतचे पंप असलेल्या राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत आहे. वीजदर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही महत्त्वाकांक्षी योजना उपयुक्त ठरत आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी अंमलात येणाऱ्या या योजनेत विकेंद्रित स्वरुपात सौर ऊर्जेद्वारे वीज तयार करून त्यावर पंप चालविण्यात येणार आहेत. या योजनेची क्षमता 16 हजार मेगावॅट इतकी असेल व त्या माध्यमातून सरासरी 3 रुपये प्रती युनिट इतक्या कमी दराने वीज उपलब्ध होणार आहे. डिसेंबर 2026 पर्यंत योजना पूर्ण होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना दिलासा देतानाच महावितरणच्या वीजखरेदी खर्चात कपात करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरली आहे.

31 हजार मेगावॅट वीज रिन्युएबल अर्थात नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांमधून मिळणार

महावितरणने नजिकच्या भविष्यातील विजेची गरज ध्यानात घेऊन रिसोर्स ॲडेक्वसी प्लॅन तयार केला असून त्यानुसार 2030 पर्यंत राज्याची विजेची क्षमता 81 हजार मेगावॅट होण्यासाठी 45 हजार मेगावॅटचे वीजखरेदी करार केले आहेत. त्यापैकी 31 हजार मेगावॅट वीज रिन्युएबल अर्थात नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांमधून मिळणार आहे. ही वीज अत्यंत किफायतशीर दरात मिळणार असल्याने आगामी पाच वर्षात महावितरणचे वीजखरेदीचे 66 हजार कोटी रुपये वाचणार आहेत. त्यामुळे महावितरणला वीजदर कपातीचा प्रस्ताव मांडता आला आणि आयोगानेही त्यानुसार आदेश दिला.

ग्राहकांना किफायतशीर दरात दर्जेदार वीज पुरवठा होणार

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या याचिकेनुसार प्रथमच वीजदर कपातीचा आदेश दिला आहे. वीजदर कपातीमुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळतानाच उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे.  मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात करण्याचे आश्वासन दिले होते व त्याचे पालन झाले आहे. दरवर्षी औद्योगिक व व्यावसायिक वीजदरात दहा टक्के वाढ होत होती. त्याऐवजी आता पुढील पाच वर्षात या घटकांच्या वीजदरात कपात होणार आहे. मा. पंतप्रधानांच्या स्वप्नाला अनुसरून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्याला एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याला वीजदर कपातीमुळे महत्त्वाचे योगदान मिळणार आहे. ग्राहकांना किफायतशीर दरात दर्जेदार वीज पुरवठा करण्यास महावितरण वचनबद्ध आहे.

मुख्यमंत्र्यांनी मानले महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाचे आभार 

राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 

साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे असे फडणवीस म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrarao Taware Won : माळेगाव कारखान्यात अजितदादांना मोठा धक्का, सांगवी गटातून 85 वर्षांच्या चंद्रराव तावरेंची बाजी
माळेगाव कारखान्यात अजितदादांना मोठा धक्का, सांगवी गटातून 85 वर्षांच्या चंद्रराव तावरेंची बाजी
मोठी बातमी! खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा, पेरण्यांपूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक
मोठी बातमी! खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा, पेरण्यांपूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक
Small Cap Fund : बजाज फिन्सर्व्ह एएमसीचा स्मॉल कॅप फंड लाँच, गुंतवणूकदारांना तीन गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार
बजाज फिन्सर्व्ह एएमसीचा स्मॉल कॅप फंड लाँच, गुंतवणूकदारांना तीन गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार
Iran : अमेरिकेकडून आण्विक तळांवर झालेल्या हल्ल्यात किती नुकसान झालं? इराणनं पहिल्यादा उत्तर दिलं, म्हणाले...
अमेरिकेच्या हल्ल्यामुळं आण्विक तळांचं मोठं नुकसान, इराणकडून अधिकृत माहिती समोर 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : महाराष्ट्रात हाय लेव्हलचा घोटाळा, जगात कुठेही तुलना होणार नाही; राऊतांचा आरोप
Mosque Loudspeakers | मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा
Masjid loudspeaker row | मशिदीवरील भोंग्यांवरून वाद | मुस्लिम संघटना अजित पवारांकडे न्यायासाठी
Weather Alert | पालघरला ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता; मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी
School Repairs | पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषद शाळा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrarao Taware Won : माळेगाव कारखान्यात अजितदादांना मोठा धक्का, सांगवी गटातून 85 वर्षांच्या चंद्रराव तावरेंची बाजी
माळेगाव कारखान्यात अजितदादांना मोठा धक्का, सांगवी गटातून 85 वर्षांच्या चंद्रराव तावरेंची बाजी
मोठी बातमी! खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा, पेरण्यांपूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक
मोठी बातमी! खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा, पेरण्यांपूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक
Small Cap Fund : बजाज फिन्सर्व्ह एएमसीचा स्मॉल कॅप फंड लाँच, गुंतवणूकदारांना तीन गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार
बजाज फिन्सर्व्ह एएमसीचा स्मॉल कॅप फंड लाँच, गुंतवणूकदारांना तीन गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार
Iran : अमेरिकेकडून आण्विक तळांवर झालेल्या हल्ल्यात किती नुकसान झालं? इराणनं पहिल्यादा उत्तर दिलं, म्हणाले...
अमेरिकेच्या हल्ल्यामुळं आण्विक तळांचं मोठं नुकसान, इराणकडून अधिकृत माहिती समोर 
95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत; धाराशिव जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी! 95 हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत
IND vs ENG : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियात मोठे बदल? दुसऱ्या कसोटीत 'या' खेळाडूंची संघात एंट्री, संभाव्य प्लेईंग -11 
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियात मोठे बदल? दुसऱ्या कसोटीत 'या' खेळाडूंची संघात एंट्री, संभाव्य प्लेईंग -11 
'सुपरस्टारच्या मुलाला माझ्यासोबत रात्र घालवायची होती, अभिनेत्री ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
'सुपरस्टारच्या मुलाला माझ्यासोबत रात्र घालवायची होती, अभिनेत्री ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 8 वीच्या विद्यार्थ्याकडून 10 वीच्या मुलाचा खून; शाळा परिसरात खळबळ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 8 वीच्या विद्यार्थ्याकडून 10 वीच्या मुलाचा खून; शाळा परिसरात खळबळ
Embed widget
OSZAR »