एक्स्प्लोर

मोठी बातमी! खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा, पेरण्यांपूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक

दुसरीकडे, कॉम्प्लेक्स खतांचा साठा मात्र राज्यात भरपूर आहे. गरजेपेक्षा 113 टक्के अधिक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे या खतांचा योग्य वापर करून ही टंचाई थोडीशी तरी भरून काढता येऊ शकते,

Fertilizer Shortage: महाराष्ट्रात खरीप पेरण्यांना आता सुरुवात झाली आहे. अनेक भागात झालेल्या विस्तीर्ण पावसामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. मात्र खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच राज्यात युरिया आणि डीएपी (डायमोनियम फॉस्फेट) या अत्यावश्यक खतांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. (Fertilizer shortage Maharashtra) या टंचाईमुळे पेरणीसाठी तयार असलेले लाखो शेतकरी चिंतेत आहेत.

राज्यातील विविध भागधारकांनी बुधवारी ही बाब स्पष्ट करत सरकारकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हंगाम सुरू होण्यापूर्वी, जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांकडून संबंधित विक्री अंतर्गत खतांची साठवणूक आणि संरक्षण केले जाते.  राज्य सरकार मार्केटिंग फेडरेशनला वाहतूक, गोदामाचे भाडे, कर्जाावरील व्याजासाठी निधीही देते. मात्र पेरण्यांच्या तोंडावर खतांचा तुटवडा असल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.

खरीप हंगामात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार,राज्यात खरीप हंगामासाठी एकूण 15.52 लाख मेट्रिक टन युरिया आणि 4.60 लाख मेट्रिक टन डीएपी खत लागते. मात्र आतापर्यंत फक्त 5.20 लाख मेट्रिक टन युरिया आणि 1.26 लाख मेट्रिक टन डीएपीच मिळाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य दरात खत मिळत नाही, आणि काळाबाजार वाढत असल्याचीही तक्रार शेतकरी करत आहेत. दुसरीकडे, कॉम्प्लेक्स खतांचा साठा मात्र राज्यात भरपूर आहे. गरजेपेक्षा 113 टक्के अधिक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे या खतांचा योग्य वापर करून ही टंचाई थोडीशी तरी भरून काढता येऊ शकते, असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी खते बियाणे कीटकनाशके विक्रेते संघटनेचे माजी अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितलं, “राज्याला आवश्यक तो साठा वेळेत मिळाला पाहिजे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) या केंद्र सरकारच्या कंपनीचं मुख्यालय मुंबईत आहे. पूर्वी या कंपनीचं 70 टक्के उत्पादन महाराष्ट्रासाठी राखून ठेवण्यात यायचं. पण सध्या हे खत राजस्थानला दिलं जातंय, आणि तिथल्या खासगी कंपन्या महाराष्ट्राला खत पुरवत आहेत. ही व्यवस्था अन्यायकारक आहे आणि सरकारने यात लक्ष घालणं गरजेचं आहे.” 

सोयाबीनचं बोगस बियाणं, 8 दिवस झाले तरी बियाणे उगवेना

नांदेड (Nanded)  जिल्ह्यातील देगलूर येथील शेतकऱ्यांनी (Farmers) सोयाबीन पिकाचे बोगस बियाणे असल्याच्या तक्रारी कृषी अधिकाऱ्याकडे केल्या आहेत. त्यावरुन आता चौकशी सुरू झाली आहे.  मध्य प्रदेशातील हे बियाणं असून,  कमी पैशात हे बियाणं बाजारात विक्रीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होते. त्यामुळं चांगलीच गर्दी केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करुन त्याची पेरणी केली परंतू, 8 दिवस झाले तरी बियाणे उगवत नसल्याने थडी सावरगाव येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी लेखी तक्रार दिली होती. त्यावरुन ही आता चौकशी सुरू झाली आहे.

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'सुपरस्टारच्या मुलाला माझ्यासोबत रात्र घालवायची होती, अभिनेत्री ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
'सुपरस्टारच्या मुलाला माझ्यासोबत रात्र घालवायची होती, अभिनेत्री ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
Jitendra Awhad : राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात नियमबाह्य, MPSC वर कुणाचा दबाब? जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात नियमबाह्य, MPSC वर कुणाचा दबाब? जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
मोठी बातमी! डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेला जामीन, 66 दिवसानंतर सुटका
मोठी बातमी! डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेला जामीन, 66 दिवसानंतर सुटका
भाजपला आणीबाणीवर बोलायचा अधिकार नाही, त्यांच्या एकाही माणसावर ईडीची कारवाई का झाली नाही? बच्चू कडूंचा हल्लाबोल
भाजपला आणीबाणीवर बोलायचा अधिकार नाही, त्यांच्या एकाही माणसावर ईडीची कारवाई का झाली नाही? बच्चू कडूंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : महाराष्ट्रात हाय लेव्हलचा घोटाळा, जगात कुठेही तुलना होणार नाही; राऊतांचा आरोप
Mosque Loudspeakers | मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा
Masjid loudspeaker row | मशिदीवरील भोंग्यांवरून वाद | मुस्लिम संघटना अजित पवारांकडे न्यायासाठी
Weather Alert | पालघरला ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता; मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी
School Repairs | पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषद शाळा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सुपरस्टारच्या मुलाला माझ्यासोबत रात्र घालवायची होती, अभिनेत्री ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
'सुपरस्टारच्या मुलाला माझ्यासोबत रात्र घालवायची होती, अभिनेत्री ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
Jitendra Awhad : राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात नियमबाह्य, MPSC वर कुणाचा दबाब? जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात नियमबाह्य, MPSC वर कुणाचा दबाब? जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
मोठी बातमी! डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेला जामीन, 66 दिवसानंतर सुटका
मोठी बातमी! डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेला जामीन, 66 दिवसानंतर सुटका
भाजपला आणीबाणीवर बोलायचा अधिकार नाही, त्यांच्या एकाही माणसावर ईडीची कारवाई का झाली नाही? बच्चू कडूंचा हल्लाबोल
भाजपला आणीबाणीवर बोलायचा अधिकार नाही, त्यांच्या एकाही माणसावर ईडीची कारवाई का झाली नाही? बच्चू कडूंचा हल्लाबोल
शिंदे गटाच्या महिला आमदाराचा पायऱ्यावर ठिय्या; उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांकडूनही आत्मदहनाचा इशारा
शिंदे गटाच्या महिला आमदाराचा पायऱ्यावर ठिय्या; उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांकडूनही आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी! 76 लाख वाढीव मतदानासंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; प्रकाश आंबेडकरांना धक्का
मोठी बातमी! 76 लाख वाढीव मतदानासंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; प्रकाश आंबेडकरांना धक्का
एकीकडे शक्तिपीठला मंजुरी, दुसरीकडे समृद्धी महामार्गावर जीवघेणे खड्डे; मनसेचा संताप
एकीकडे शक्तिपीठला मंजुरी, दुसरीकडे समृद्धी महामार्गावर जीवघेणे खड्डे; मनसेचा संताप
Jalna Crime: 70 लाख रुपयांची खंडणी मागितली, जालन्यात तिघांना अटक; आरोपींकडून 21 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
70 लाख रुपयांची खंडणी मागितली, जालन्यात तिघांना अटक; आरोपींकडून 21 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
Embed widget
OSZAR »