Vaibhav Naik On Bharat Gogawale : गोगावले राणेंबाबत बोलले ते योग्यच, वैभव नाईकांची प्रतिक्रिया
Vaibhav Naik On Bharat Gogawale : गोगावले राणेंबाबत बोलले ते योग्यच, वैभव नाईकांची प्रतिक्रिया
निलेश राणेंना भानगडी करायची गरज नाही
भरत गोगावले म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण गेले अनेक वर्ष पाहतोय. निलेश राणेंच्या रुपाने सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली. भानगडी केला नाही तो शिवसैनिक नव्हे. केसरकर भानगडी करणारे नाहीत त्यामुळे अडचण होते. मात्र निलेश राणे जशास तसं उत्तर देणारे आहेत. पण आता भानगडी करायचे दिवस संपले आहेत. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालवायचं आहे असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे.
भरत गोगावले म्हणाले की, "आम्हाला तुम्ही निवडून दिलात आता त्याची परत फेड करण्यासाठी आम्ही आलो आहोत. येत्या चार महिन्यात निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना अत्यंत सावध रहावे लागते. तुम्हाला लागेल ती ताकद देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. केसरकर साहेब भानगडी करणारे नाहीत. ज्याने भानगड केली नाही तो शिवसैनिक होऊ शकत नाही. काही पक्ष आपण शत प्रतिशत आहोत असं म्हणतात. मग आम्ही पण शत प्रतिशत जाऊ शकत नाही का? कोकणात आज आपला पक्ष नंबर एक आहे."
भरत गोगावले म्हणाले पुढे की, "आम्ही गरिबांचे शेठ आहोत, श्रीमंताचे नाही. आमच्याकडे मनाची श्रीमंती आहे. आम्ही पालकमंत्री पण होऊ, आम्ही काम करतोय. त्याचा मोबदला मागतोय. सगळीकडे महायुती म्हणून जुळेल असंही नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचे दोन तर भाजपाचा एक आमदार आहे. आम्हाला समजून घेतलं तर आम्ही समजून घेऊ. माझ्या खात्यात कोकणाला झुकत माप देऊ."




