Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्या
Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्या
संतोष देशमुख यांच्या हत्येची (Santosh Deshmukh murder case) घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि दृष्ट प्रवृत्तींनी केलेली होती असे मत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केले. या घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोण, या घटनेत देण्यात येणार न्याय हे महत्वाचं असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. कोणतीही चुकीची घटना टाळता येणं शक्य होतं. ती घटना घडू नये यासाठी तेथील प्रशासन स्ट्रॉंग असणं गरजेचं होतं असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. तिथे प्रशासनाचा धाक असालया पाहिजे होते. अशा मुलांना पाठिशी घालणाऱ्या यंत्रणा तिथं नसायला हव्या होत्या असंही त्या म्हणाल्या. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
100 दिवसात आम्हाला कार्यक्रम सुरु करायचे होते, ते आम्ही केलं
सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. माझ्याकडे दोन खाती आहेत. एक पर्यावरण आणि दुसरे पशुसंवर्धन. अधिवेशनाचा एकही दिवस असा नाही की पर्यावरणाच्या संदर्भात चर्चा होत नाही. हा एक महत्वाचा बदल असल्याचे मत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला 100 दिवसांचे कार्यक्रम दिले होते. हे कार्यक्रम आम्हाला सुरु करायचे होते, यामध्ये आम्हाला यश आल्याचे मुंडे म्हणाल्या. नवीन पॉलिसीमार्फत पर्यावरण विभाग कसा सक्षम होईल यावर आम्ही करत असल्याचे मुंडे म्हणाल्या.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

