Operation Sindoor : पाकिस्तानने जिथून फतेह क्षेपणास्त्र डागलं, त्याच एअरबेसचा भारतानं केला चक्काचूर

Operation Sindoor : युद्धबंदीनंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव थोडा कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Continues below advertisement

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलग चार दिवस चाललेल्या लष्करी तणावानंतर (India Pakistan Tension) शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्याआधी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला उत्तर म्हणून पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांवर भारताने दिलेली तीव्र लष्करी प्रतिक्रिया, यामुळे संपूर्ण दक्षिण आशिया सतर्क झाला होता. दरम्यान, शुक्रवारी उशिरा पाकिस्तानच्या लष्कराने मोठा दावा केला की, भारताने सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, ज्यांनी पाकिस्तानच्या (Pakistan) चार प्रमुख एअरबेसना लक्ष्य केले आहे. या क्षेपणास्त्रांचे लक्ष्य रावळपिंडी, मुरिद चक्रवाल, शरकोट (शोरकोट) आणि नूर खान हे एअरबेस होते, जिथे कथितरित्या गंभीर नुकसान झाले आहे, असा दावा पाकिस्तानने केला आहे.   

Continues below advertisement

22 एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी ठिकाणांवर अचूक हवाई हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून भारतातील 26 शहरांना लक्ष्य करत हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भारतीय S-400 एअर डिफेन्स सिस्टम आणि अन्य हवाई संरक्षण प्रणालींनी हे सर्व हल्ले पूर्णतः निष्फळ ठरवले. त्यानंतर भारताने आपली लष्करी ताकद दाखवत प्रत्युत्तरात पाकिस्तानमधील चार वायुसेना तळांवर हल्ला केला होता.

फतेह-1 क्षेपणास्त्राला भारताचे प्रत्युत्तर

पाकिस्तानने भारताविरुद्ध फतेह-1 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर केल्याचा दावा केला होता. मात्र, हा निर्णय पाकिस्तानसाठी सर्वात मोठी चूक ठरली. भारताने या क्षेपणास्त्र हल्ल्याला यशस्वीरित्या निष्फळ ठरवले. पाकिस्तानच्या लष्करानुसार, भारताने जालंधरमधील आदमपूर एअरबेसवरून क्षेपणास्त्रे डागली आणि या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील सर्व प्रमुख एअरबेस तात्काळ बंद करण्यात आले. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती. भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, भारतीय लष्कराची कारवाई आणि तयारी पाहता हे स्पष्ट होते की, भारत आता दहशतवादाविरोधात ठोस आणि निर्णायक भूमिका घेऊ लागला आहे. 

पाकिस्तानची भित्री रणनीती उघड

भारतीय लष्करातील अधिकारी सोफिया कुरैशी यांनी खुलासा केला आहे की,भारतीय लष्करी अधिकारी सोफिया कुरेशी यांनी खुलासा केला की, पाकिस्तान लष्करी तळ लपविण्यासाठी जाणूनबुजून नागरी विमानांचा वापर करत आहे. हे आंतरराष्ट्रीय नियमांचे गंभीर उल्लंघन आहे आणि जगासमोर पाकिस्तानची भित्री रणनीती उघड करते. भारताने या संदर्भात अनेक पुरावेही सादर केले आहेत, ज्यावरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तान दहशतवादाचा आधार घेऊन युद्धभूमीत उतरू इच्छित होता, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा

ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोची एन्ट्री, पाकिस्तानच्या अवकाशावर 10 उपग्रहांची नजर, प्रत्येक हालचाल टिपणार!

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »