दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन, विदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळात ठाकरेंच्या खासदारालाही स्थान; काय म्हणाले केंद्रीयमंत्री
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काल उद्धव ठाकरे जी यांच्याशी या शिष्टमंडळासंदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला.

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आणि सैन्य दलाच्या (indian army) कारवाईसंदर्भात जगभरातील विविध देशांत जाऊन सत्यता व माहिती देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यासाठी, सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार करण्यात आले असून शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचा सहभाग झाला आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून एकाही खासदाराचा सहभाग या शिष्टमंडळात करण्यात आला नव्हता. त्यावरुन, खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. संसदेतील आपल्या खासदारांचं संख्याबळ सांगत त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षात भेदभाव केल्याचेही म्हटले होते. त्यानंतर, आता केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन करुन सर्वपक्षीय शिष्टमंडळ संदर्भात माहिती दिली. तसेच, या शिष्टमंडळात शिवसेना युबीटी पक्षाच्या खासदाराचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काल उद्धव ठाकरे जी यांच्याशी या शिष्टमंडळासंदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला. देशाचे हे शिष्टमंडळ दहशतवादाविरुद्ध आहे आणि याची खात्री मिळाल्यावर, आम्ही सरकारला आश्वासन दिले आहे की आम्ही या शिष्टमंडळाद्वारे आपल्या देशासाठी जे योग्य आणि आवश्यक ते करू इच्छितो. त्यानुसार, खासदार प्रियंका चतुर्वेदी देशभरातील इतर खासदारांसह या शिष्टमंडळाचा भाग असतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, या शिष्टमंडळात शिवसेना युबीटीकडून खा. प्रियंका चतुर्वेदी यांची वर्णी लागली आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत विशेषतः पाक-आधारित दहशतवादाविरुद्ध आणि त्यांचे तळ नष्ट करण्यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला आहे. दहशतवादाविरुद्ध कारवाई करणाऱ्या सशस्त्र दलांमध्ये आपण सर्वजण एक आहोत, याबद्दल कोणतेही दुटप्पी मत असू नये. पहलगामवरील राजनैतिक परिस्थिती आणि अयशस्वी गुप्तचर/सुरक्षा यंत्रणेबद्दल आपले मत आहे आणि आम्ही आपल्या देशाच्या, आपल्या देशाच्या हितासाठी प्रश्न विचारत राहू. तथापि, पाकिस्तान आधारित दहशतवादाला एकाकी पाडण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आले पाहिजे. आम्ही केंद्र सरकारला असेही कळवले आहे की या कारणासाठी आम्ही एकत्र असलो तरी, गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी या प्रतिनिधीमंडळांबद्दल पक्षांना चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा एक नियम पाळला पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
The India delegations visiting various countries and SS UBT participation:
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 20, 2025
Union Minister Shri Kiren Rijiju ji had a telephonic call with Party President Shri Uddhav Thackeray ji, yesterday, with regards to this delegation.
This delegation is about India against terrorism, not…
राष्ट्रीय हिताच्या कृतीला आमचा पाठिंबा
कालच कॉलद्वारे आम्ही राष्ट्रीय हिताच्या अशा कोणत्याही कृतीला आमचा पाठिंबा पुन्हा जाहीर केला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर या विषयावर लवकरात लवकर चर्चा करण्यासाठी आणि यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
हेही वाचा
ह्या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच...; मंत्रिपदाची शपथ घेताच छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर थेट हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
