दुष्काळी झळा सोसणाऱ्या बीड जिल्ह्याला मोठा दणका, 17 सिंचन प्रकल्पाची मान्यता रद्द, नेमकं प्रकरण काय?
बीड (Beed) जिल्ह्यासाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या 17 सिंचन प्रकल्पाची मान्यता रद्द झाली आहे.

Beed : बीड (Beed) जिल्ह्यासाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या 17 सिंचन प्रकल्पाची मान्यता रद्द झाली आहे. दुष्काळी बीड जिल्ह्याला पाणीदार बनवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून 17 सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर होऊनही तीन वर्षात प्रकल्पाचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने या प्रकल्पाची मान्यता रद्द केली आहे. दुष्काळी झळा सोसणाऱ्या बीड जिल्ह्याला हा मोठा धक्का मानला जात आहे.
गाव तलाव, पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधारे यांचा यात समावेश होता.. जलसंपदा विभागातील प्रलंबित प्रकल्प रद्द करण्यासाठी दोन बैठका झाल्या.. या सिंचन प्रकल्पासाठी 5 कोटी 33 लाखांचा निधी देण्यात आला होता.. दरम्यान आता लोकप्रतिनिधी याबाबत काय निर्णय घेतात? याकडेच लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Rain Update : मे महिन्यातच पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हर फ्लो, बीडचं बिंदुसरा, साताऱ्याचं महींद धरणात पाणीच पाणी, मराठवाड्यात अतिवृष्टी