मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील 5 दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे, कृषी विद्यापिठाची शिफारस काय? वाचा..
मराठवाड्यात अनेक भागात वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काय करावे? वाचा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठानं दिलेला कृषीसल्ला...

Marathwada Weather Update: राज्यभरात पुढील पाच दिवस पावसाला पोषक स्थिती तयार झाली असून मराठवाड्यात आजपासून 28 जूनपर्यंत पावसाची हजेरी राहणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्रानं सांगितलं आहे. मराठवाड्यात अनेक भागात वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीच्या हलचाली कराव्यात की नाही? पीक व्यवस्थापन कसे करावे यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून कृषी हवामान आधारित कृषी सल्ला देण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस मराठवाड्यात हवामान कसे?
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 व 25 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, दिनांक 26 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 24 जून रोजी काही ठिकाणी तर दिनांक 25 व 26 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 27 व 28 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
शेतकऱ्यांनी काय करावे?
- पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच कापूस पिकाची लागवड करावी. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते.
- कापूस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. लागवड केलेल्या कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
- पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच तुर पिकाची पेरणी करावी.
- तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
- पावसाळ्यात तूर पिकावरील फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी, शेताच्या चारी बाजूस तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद चर काढावी जेणे करून अतिवृष्टी मध्ये शेतातील मातीची धूप होणार नाही व पिकाचे मुळे सडणार नाहीत. तसेच पुढे चरातील पाणी पाऊस ओसरल्यावर शेतातील पिकास परत कामी येईल.
- पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मूग/उडीद पिकाची पेरणी करावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.
- पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या मूग/उडीद पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच भुईमूग पिकाची पेरणी करावी.
- भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
- पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मका पिकाची पेरणी करावी. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या मका पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
फळबागेचे व्यवस्थापन कसे कराल?
- नवीन केळी बागेची लागवड करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. लागवडीच्या वेळेस शेणखत तर लागवडीनंतर 30 दिवसाने रासायनिक खत व्यवस्थापन करावे.
- केळी बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.नवीन आंबा लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
- आंबा बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी.
- द्राक्ष बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते. द्राक्ष बागेतील वेलीची बांधणी करावी. द्राक्ष बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
- नवीन सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. सिताफळ बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.