Sujay Vikhe Patil : मामा,भाचे,पुतणे कोणीही आलं तरी जनतेसाठी आम्ही योग्य काम करू
Sujay Vikhe Patil : मामा,भाचे,पुतणे कोणीही आलं तरी जनतेसाठी आम्ही योग्य काम करू
याबाबतीत भाजपाचे मुख्यमंत्री व वरिष्ठ निर्णय घेतील.. कोणाशीही मैत्री ही मैत्रीच्या जागेवर असते.. आम्ही देखील भाजपात आलो त्यावेळेस काही लोकांना आवडलं नसेल... मात्र पक्षाने त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला.. त्यामुळे कोणी नवीन येत असेल तर त्याला मी विरोध करणे संयुक्तिक होणार नाही.. संगमनेर तालुक्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये आम्ही मागे हटणार नाही भविष्यात एका पक्षात असलो तरी स्थानिक राजकारण हे वेगळं असतं ते कायम राहील.. कोणी आलं पक्षात किंवा नाही आलं तरी आमच्या पन्नास वर्षात जे राजकारण झालं ते यापुढेही सुरूच राहील मामा, भाचे, पुतणे कोणीही आलं तरी जनतेच्या हितासाठी आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करत राहणार... ऑन मयुरी प्रकरण अजित पवार टीका अजित पवार एक होतकरू नेतृत्व.. आम्ही देखील अनेक लग्नात जातो भेटी देतो.. त्यातील अनेक संसारांबाबत वेगवेगळ्या गोष्टी घडतात.. मी गेलेल्या एका लग्नात तर नवरीच पळून गेली होती मग काय करणार.. त्यामुळे अशा प्रकरणात राजकीय व्यक्तींना आणलं गेलं नाही पाहिजे.. हगवणे यांना यापूर्वी कोणीही ओळखत नव्हतं मात्र आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखु लागला.. त्यांनी केलेलं कृत्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे.. मात्र राजकीय व्यक्तींना अशा प्रकरणात ओढू नये.. आमच्याबरोबर देखील अनेक जण फोटो काढतात.. त्यानंतर काहीजण म्हणतात वाळू तस्कर आहे.. हा आरोपी होता.. हे टाळायचं असेल तर कायदाच करावा लागेल.. प्रत्येक आरोपीच्या कपड्यावर बिल्ला लावण्याची वेळ येईल.. केवळ लग्नाला गेल्यामुळे अजित दादांना काही लोक टार्गेट करतात.. आणि जे सध्या बोलतायेत ते शिवसेना उबाठा गटाचे असतील तर त्यांना लग्नाच्या पत्रिकाच येत नाही.. ज्या लोकांना पत्रिका येत नाही त्या लोकांना कोणी लग्नात गेला तर त्याचा त्रास होऊ शकतो.. त्यामुळे उबाठा आणि पवार गटाच्या प्रवक्त्यांना देखील लग्नाच्या पत्रिका द्यायला सुरुवात करा..





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
