Special Report : Shiv Sena-MNS Alliance : युतीबाबत शिवसेना सकारात्मक, मनसे शंकित
Special Report : Shiv Sena-MNS Alliance : युतीबाबत शिवसेना सकारात्मक, मनसे शंकित
शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. यावेळी ठाकरेंची शिवसेना मनसे सोबत युती करायला पूर्णपणे सकारात्मक आहे असं संजय राऊत सांगतायत. मराठी माणसासाठी मनसे सोबत एक पाऊल पुढे टाकायला मनसे दिलसे तयार असल्याच ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुधाने दोन वेळा तोंड पोळलेली मनसे ताक सुद्धा आता फुंकून पिताना दिसते. उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याच मनसेकडून सांगण्यात येत. पाहूया या संदर्भातला रिपोर्ट. स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एमएनएस म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे. जळमट आणि दूर ठेवून आपल्याला एकत्र यावे लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका. आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही. ही भूमिका एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे. मराठी माणसाच अहित होता कामा नये. तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदनाठ. संजय राऊत काय म्हणाले ते थोडक्यात पाहूयात. उद्धव ठाकरे यांच्या सोबत आमच्या सगळ्यांची मनसे बाबत चर्चा झाली. मनसे संदर्भात सकारात्मक पावल टाकायला हरकत नाही. असं उद्धव ठाकरेंच म्हणण आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि दिलसे ही भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे, सर्व शिवसेना आणि आम्ही सगळे राज ठाकरे यांच्या सोबत नात जोडायला पूर्णपणे सकारात्मक आहोत. महाराष्ट्राच्या जनतेचे दोघांवरती भावनिक आणि राजकीय प्रेशर आहे. गेले काही दिवस संजय राऊत सतत हीच भूमिका मांडतायत. ही भूमिका ऐकून यावेळी ठाकरेंची शिवसेना मनसे सोबत युती करण्यात. साठी पूर्णपणे अनुकूल आणि सकारात्मक आहे असं चित्र उभं राहतं. मात्र उद्धव ठाकरेंच भाषण ऐकलं, त्यांनी टाकलेल्या अटीशरती ऐकल्या की कन्फ्युजन आणखी वाढलं. उद्धव ठाकरेंच्या बोलण्याचा नेमका काय अर्थ काढायचा ते भल्या भल्यांना लक्षात आलं नाही. कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडण, आमच्यातल्या गोष्टी त्या किरकोळ आहेत. किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडण आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचा आवाहन करतो. मात्र याचा पुढचा अध्याय सुरू व्हायच्या आतच ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावर गेले. मायदेशी परत आल्यानंतर सुद्धा युती चर्चेची गाडी काही पुढे गेलीच नाही आणि या चर्चांना पूर्ण विराम मिळाला.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
