ट्रेंडिंग
Asia Cup 2025: ...म्हणून टीम इंडिया आशिया चषकातून माघार घेणार?; महत्वाची माहिती आली समोर
Asia Cup 2025: आगामी आशिया चषकातून टीम इंडिया माघार घेणार असल्याचं समोर आलं आहे.
Asia Cup 2025: पुरुषांचा आशिया कप 2025 या (Asia Cup 2025) सप्टेंबरमध्ये होणार आहे, जो भारत आयोजित करणार आहे. पण या स्पर्धेवर एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे, कारण एका वृत्तानुसार भारतीय क्रिकेट संघाने या स्पर्धेतून आपले नाव मागे घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नक्वी यांना कळवले की त्यांनी जूनमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग संघ आशिया कप आणि पुरुष आशिया कप 2025 मधून आपला संघ मागे घेतला आहे. अशा परिस्थितीत आशिया कप 2025 वर संकटाचे ढग दाटून येत आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर बीसीसीआयचा मोठा निर्णय-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या अंतरानंतर बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर नावाची एक कारवाई केली, ज्यामध्ये पीओके आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. अशा परिस्थितीत, भारतीय संघ एसीसी आयोजित करत असलेल्या स्पर्धेत खेळू शकत नाही आणि त्याचे अध्यक्ष पाकिस्तानी मंत्री आहेत.
बीसीसीआय म्हणाला- ही देशाची भावना आहे
बीसीसीआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की ही देशाची भावना आहे. आगामी महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपमधून आम्हाला काढून टाकल्याबद्दल आम्ही एसीसीला तोंडी कळवले आहे. आम्ही भारत सरकारच्या सतत संपर्कात आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की यावर्षी भारत आशिया कपचे आयोजन करणार होता. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाला लक्षात घेऊन ही लीग टी-20 स्वरूपात खेळवली जाणार आहे. 2023 मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये भारताने श्रीलंकेला पराभूत करुन ट्रॉफी जिंकली.
आशिया कप 2025 वर संकट-
आशिया कपचे बहुतेक प्रायोजक भारतातील आहेत, त्यामुळे बीसीसीआयने आशिया कप 2025 मधून माघार घेतल्याने ही स्पर्धा रद्द होऊ शकते. भारताव्यतिरिक्त, श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश सारखे संघ आशिया कपमध्ये भाग घेतात.
टीम इंडियाने 8 वेळा जिंकलेय जेतेपद-
आशिया चषक ही आशियातील प्रमुख क्रिकेट स्पर्धा आहे, जी 1984 पासून आयोजित केली जाते. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इतर आशियाई संघ सहभागी होतात. स्पर्धा एकदिवसीय आणि ट्वेंटी- 20 या दोन्ही स्वरूपात खेळवली जाते. भारत हा आशिया चषकातील सर्वाधिक यशस्वी संघ आहे, भारताने एकूण 8 वेळा विजेतेपद पटकावले आहे. श्रीलंका 6 वेळा आणि पाकिस्तान 2 वेळा विजेतेपद मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.