एक्स्प्लोर
धक्कादायक! अक्कलकोटमध्ये कोणत्याही सुरक्षेविना दहावीचा गणिताच्या उत्तरपत्रिका चक्क रिक्षातून आणल्या, प्रशासनाचा ढिसाळपणा, पहा Photos
अक्कलकोटमध्ये दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गणिताच्या पेपर लिहून तब्बल ८ तासांनी स्ट्राँगरुममध्ये कोणत्याही सुरक्षेविना रिक्षातून आणण्यात आला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

10th board
1/10

गेल्या काही दिवसांपूर्वी बारावी बोर्डाच्या उत्तर पत्रिका बसमध्ये तपासत असल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
2/10

ही घटना ताजी असतानाच सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये दहावी बोर्डाच्या गणिताच्या उत्तरपत्रिका चक्क रिक्षातून आणल्या गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.
3/10

दुपारी एक वाजता पेपर संपल्यानंतर रात्री पावणे नऊ वाजता उत्तर पत्रिका स्ट्रॉंगरूममध्ये जमा होतातच कशा? असा सवाल आरपीआय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.
4/10

त्यामुळे पुन्हा एकदा दहावी-बारावी बोर्डाच्या बाबतीत प्रशासन इतके ढिसाळ कसे राहू शकते असा प्रश्न उपस्थित होतोय.
5/10

विद्यार्थ्यांनी लिहिलेला दहावीचा गणिताचा पेपर कोणतीही सुरक्षा न घेता रिक्षाने आणल्याचा आरपीआय संघटनेचा आरोप आहे.
6/10

या उत्तर पत्रिका इतक्या उशिरा स्ट्रॉंगरूममध्ये जमा करण्याचे कारण कोणाला फायदा पोहोचवणे आहे का? आरपीआय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला.
7/10

काही विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका पुन्हा एकदा लिहल्या गेल्यात का? असा संशय व्यक्त केला जातोय.
8/10

प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
9/10

दरम्यान या प्रकारणी गटशिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल
10/10

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची एबीपी माझाला फोनवरून माहिती दिली.
Published at : 11 Mar 2025 11:44 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
