ट्रेंडिंग
सर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात होतात, जगातील 'हा' विकसित देश पहिल्या स्थानावर, भारत कितव्या स्थानी?
Most Plane Crash Country In World: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या एआय -171 विमानचा अपघात झाला. या घटनेत 275 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
नवी दिल्ली: गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनच्या गॅटविकला जाणारं विमानं मेघाणीनगरमध्ये कोसळलं होतं. बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळल्यानं प्रवासी आणि इतर नागरिक मिळून 275 जणांचा मृत्यू झाला. एअर इंडियाच्या त्या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. 242 पैकी केवळ 1 जण वाचला तर 241 जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला. ही घटना ताजी असतानाच केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. अहमदाबाद विमान अपघाताच्या निमित्तानं सर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात होतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्लेन क्रॅश झालं, यात 241 जणांचा मृत्यू झाला. तर,2020 मध्ये देखील एक विमान अपघात झाला होता. विमान दुबईवरुन केरळमध्ये परत येत होतं. पावसामुळं विमान रनवेवरुन घसरलं आणि त्याचे दोन तुकडे झाले. त्या दुर्घटनेत 21 लोकांचा मृत्यू झाला होता. विमानात 190 प्रवासी प्रवास करत होते.
सर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात?
सर्वाधिक विमान अपघातांच्या बाबतीत पहिल्या स्थानावर अमेरिका आहे. या देशात सर्वाधिक विमान अपघात होतात. Statista च्या गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार 1945 पासून 2022 पर्यंतची माहिती देण्यात आली आहे. 77 वर्षात 864 विमान दुर्घटना झाल्या आहेत. त्यानुसार एका वर्षात 11-12 विमान अपघात एका वर्षात होतात. या यादीत रशिया दुसऱ्या स्थानावर असून तिथं 539 विमान अपघात झाले आहेत. कॅनडात 191 , ब्राझीलमध्ये 190 अपघात झाले आहेत. कोलंबिया या यादीत पाचव्या स्थानावर असून इथं झालेल्या अपघातांची संख्या 184 इतकी आहे.
भारत आणि चीन कितव्या स्थानी?
सर्वाधिक विमान अपघातांच्या यादीत टॉप 10 मध्ये भारत दहाव्या स्थानावर आहे. गेल्या 77 वर्षात भारतात 95 विमान अपघात झाले आहेत. भारतानंतर चीनचा नंबर येतो, चीनमध्ये 76 विमान अपघात झाले आहेत. आशियामधील विमान अपघातांचा विचार केला असता इंडोनेशिया टॉपवर आहे. एएसएनच्या रिपोर्टनुसार इंडोनेशियात 25 वर्षात 20 हून अधिक विमान अपघात झाले आहेत. ज्यात 2000 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत या यादीत तिसऱ्या स्थानावर असून भारतात 15 विमान अपघात झाले आहेत.