एक्स्प्लोर

39 वर्षांपासून दिमाखात उभा असलेला शिवरायांचा पुतळा हटणार; नव्या पुतळ्यासाठी 10 कोटी मंजूर

भिवंडीतील चौकात याच ठिकाणी 1986 साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता

ठाणे :  छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji maharaj) हे प्रत्येक भारतीयांची मराठी माणसांची अस्मिता आहे. शिवरायांच्या प्रेरक आणि पराक्रमी इतिहासातून प्रेरणा घेत येथील सरकारचा राज्य कारभार चालला जातो. प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे. त्यामुळे, गावागावात शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आणि पुतळे बसवण्यात आले आहेत. चौकातील हे पुतळे शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास आपल्याला सांगतात. त्यामुळेच, या पुतळ्यांची विशेष काळजी घेण्याचं काम स्थानिक प्रशासनाकडून केलं जातं. भिवंडीतील (Bhiwandi) छत्रपती शिवाजी महाराज चौक गेली अनेक दशके शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, आता हा पुतळा हटविण्यात येत असून लवकरच या जागी नवा पुतळा बसवण्यात येत आहे. 

भिवंडीतील चौकात याच ठिकाणी 1986 साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. 39 वर्षांपासून हा पुतळा शहरवासीयांसाठी प्रेरणेचे प्रतीक ठरला आहे. मात्र, काळाच्या ओघात या पुतळ्याला अनेक ठिकाणी तडे गेले असून, त्याची झीज झाल्याचे निदर्शनात आली आहे. ही बाब लक्षात घेता शासनाकडून पुतळ्याच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नव्याने उभारला जाणारा पुतळा अधिक भव्य, आकर्षक आणि मजबूत असेल, अशी माहिती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने दिली आहे. या कामासाठी विहित ई-निविदा प्रक्रियेनंतर सागर कन्स्ट्रक्शन कंपनी, उल्हासनगर या संस्थेला काम देण्यात आले आहे. पुतळा स्थलांतराची प्रक्रिया 16 मे 2025 रोजी पहाटे 2 वाजेनंतर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत चौथऱ्याचे निष्कासनही करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व प्रशासकीय मंजुरी मिळाली असून पुतळा स्थलांतरांचे काम हाती घेण्यात आले आहे. 

सिंधुदुर्गात नव्याने उभारला पुतळा

महानगरपालिकेकडून सांगण्यात आले की, ही संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून पार पाडली जाणार आहे. शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया असल्या तरी, नव्या पुतळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान, नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि जगातील सर्वात उंच पुतळा बसवण्यात आला आहे. कारण, गतवर्षी वादळी वाऱ्यामुळे येथील पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली होती. 

हेही वाचा

डोनाल्ट ट्रम्प यांच्यावर कंगनाची बोचरी टीका; जेपी नड्डांचा फोन येताच 'ट्विट क्विक डिलीट', पण स्क्रीनशॉट व्हायरल

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं, एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगाला दाखवलं, अमित शाहांचं घणाघाती भाषण
मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं, एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगाला दाखवलं, अमित शाहांचं घणाघाती भाषण
Pune Crime: गुहागरमधून लोणावळ्यात देवदर्शनासाठी गेला,  रात्री गाडी वळवण्याच्या वादातून कमलेशला स्थानिक तरुणांनी संपवलं
धक्कादायक! गुहागरमधून लोणावळ्यात देवदर्शनासाठी गेला, रात्री गाडी वळवण्याच्या वादातून कमलेशला स्थानिक तरुणांनी संपवलं
Siddhant Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप; दानवे, इम्तियाज जलील संतापले, चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं; म्हणाले...
संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप; दानवे, इम्तियाज जलील संतापले, चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं; म्हणाले...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, नाशिकमध्ये आरोग्ययंत्रणा अलर्ट मोडवर, 5 हजार अँटिजन किटची खरेदी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, नाशिकमध्ये आरोग्ययंत्रणा अलर्ट मोडवर, 5 हजार अँटिजन किटची खरेदी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Siddhant Shirsat Controversy : विवाहितेशी संबंध,लग्न आणि धोका!शिरसाटांच्या लेकावर गंभीर आरोपSanjay Raut on Eknath Shinde : मुंबई तुंबली तेव्हा दिघे स्वप्नात आले, विचारलं एकनाथ कुठे आहे?Mumbai Goa Highway Potholes : मुंबई-गोवा महामार्गावर भला मोठा खड्डा, अडकलेली बस काढायला मागवली क्रेनSolapur Bus In Rain : बोनटपर्यंत पाणी, बसही झाली बंद; सोलापुरात पुलाखाली अडकली एसटी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं, एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगाला दाखवलं, अमित शाहांचं घणाघाती भाषण
मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं, एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगाला दाखवलं, अमित शाहांचं घणाघाती भाषण
Pune Crime: गुहागरमधून लोणावळ्यात देवदर्शनासाठी गेला,  रात्री गाडी वळवण्याच्या वादातून कमलेशला स्थानिक तरुणांनी संपवलं
धक्कादायक! गुहागरमधून लोणावळ्यात देवदर्शनासाठी गेला, रात्री गाडी वळवण्याच्या वादातून कमलेशला स्थानिक तरुणांनी संपवलं
Siddhant Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप; दानवे, इम्तियाज जलील संतापले, चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं; म्हणाले...
संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप; दानवे, इम्तियाज जलील संतापले, चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं; म्हणाले...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, नाशिकमध्ये आरोग्ययंत्रणा अलर्ट मोडवर, 5 हजार अँटिजन किटची खरेदी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, नाशिकमध्ये आरोग्ययंत्रणा अलर्ट मोडवर, 5 हजार अँटिजन किटची खरेदी
Nashik Jindal Company Fire : तब्बल 60 तासांनी आग आटोक्यात आल्यानंतर नाशिकच्या जिंदाल कंपनीला 'क्लोजर नोटीस'; पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचा संशय
तब्बल 60 तासांनी आग आटोक्यात आल्यानंतर नाशिकच्या जिंदाल कंपनीला 'क्लोजर नोटीस'; पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचा संशय
Mumbai Rains Aqua Line Metro: मुंबईतील भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष, 2017 साली MMRDA ने दिलं होतं उत्तर, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष, 2017 साली MMRDA ने दिलं होतं उत्तर, धक्कादायक माहिती समोर
R T Deshmukh Accident: आर टी देशमुखांच्या गाडीचा अपघात कसा झाला? बेलकुंडजवळच्या रस्त्यावर 'त्या' गोष्टीने घात केला
आर टी देशमुखांच्या गाडीचा अपघात कसा झाला? बेलकुंडजवळच्या रस्त्यावर 'त्या' गोष्टीने घात केला
Mumbai Crime news: मुंबईत 25 वर्षांच्या तरुणीने बिल्डिंगच्या 22 व्या मजल्यावरुन उडी मारली, खाली पडल्यानंतर शरीराचे दोन तुकडे झाले अन्...
मुंबईत 25 वर्षांच्या तरुणीने बिल्डिंगच्या 22 व्या मजल्यावरुन उडी मारली, शरीराचे दोन तुकडे झाले अन्...
Embed widget
OSZAR »