ब्रिटिशांपासून लपवलेली शस्त्रं दशकांनी सापडली, महाबळेश्वरच्या विहिरीत 'इतिहास' गवसला, शिवकालीन ठेव्याशी साधर्म्य
या तलवारी बनवताना फ्रेंच आणि पोर्तुगीज बनावटीच्या उत्कृष्ट दर्जाच्या पोलादी पात्यांचा वापर करण्यात येत असे, म्हणूनच त्यांना 'फिरंगी' असेही म्हणत.

Satara: महाबळेश्वरच्या एका विहिरीत ब्रिटिशांच्या नजरेत येऊ नये म्हणून लपवलेली काही ऐतिहासिक पुरातन शस्त्रे सापडली आहेत. महाबळेश्वरच्या एका कोरड्या विहिरीत पुरातत्त्व खात्याला इतिहास गवसलाय. मराठा झोप या पद्धतीच्या या दुर्मिळ तलवारी अतिशय महत्त्वाच्या आहेत. इंडियन आर्म्स ऍक्टनंतर ब्रिटिशांनी अनेक शस्त्रे जप्त करून टाकली. त्यातली शिवकालीन धाटणीची शस्त्रे असल्याचे सांगितलं जात आहे. या शस्त्रांमध्ये मराठा धूप प्रकारच्या तलवारीची मूठ, इतर पुरातन वस्तु सापडले आहेत.
मराठा युद्धनीती व शस्त्रांच्या अभ्यासात धूप तलवारी या उत्कृष्ट पोलाद दर्जासाठी प्रसिद्ध होत्या. त्यामुळे या तलवारींसाठी फ्रेंच पोर्तुगीज या देशातील बनावटीचे पाते वापरत असल्यामुळे या तलवारींना फिरंगी देखील म्हटले जात असत. या तलवारीमध्ये धूप आणि वक्र असे दोन उपप्रकार आहेत. 3 मे 2025 रोजी महाबळेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातन वस्तूंचा अभ्यास करताना इतिहास अभ्यासक मयुरेश मोरे व स्थानिक जाणकार राहुल कदम यांना या वस्तू निदर्शनास आल्या.
विशिष्ट पद्धतीनं बनवल्या गेलेल्या दूर्मिळ तलवारी
शत्रूंला भोसकण्यासाठी वक्र आणि धोप प्रकारच्या तलवारींचा वापर केला जात.वक्र आणि धोप या तलवारी घोडदळासाठी वापरल्या जात असत. त्याची लांबी 4 फूट असत. या फिरंगी पात्यांना मराठ्यांनी युद्धामध्ये जास्त काळ टिकण्यासाठी व हाताला इजा हाऊ नये अशा प्रकारे या तलवारींची मूठ बनवली जत असे. या तलवारींचा समतोल बॅलन्स उत्तम असल्यामुळे या तलवारी अभ्यासासाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याची माहिती मयुरेश मोरे यांनी दिली. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये या तलवारी सापडल्यानंतर स्थानिकांनी व अभ्यासकांनी ही माहिती गावातील प्रमुख व्यक्तींना दिली. त्यानंतर उपविभागिय अधिकारी तसेच तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, तसेच साताऱ्याचे युवा ट्रेकर्स जयवंत बिरामणे आणि संपूर्ण टीमने या ऐतिहासिक वस्तू विहिरीतून बाहेर काढल्या.
मराठा काळातील धोप पद्धतीच्या तलवारी ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत दुर्मीळ आणि मौल्यवान मानल्या जातात. इंग्रजांनी भारतीय शस्त्रास्त्र कायदा लागू केल्यानंतर अनेक पारंपरिक शस्त्रे ताब्यात घेऊन नष्ट केली. मात्र काही शस्त्रं अशा कारवायांमधून वाचली आणि तीच आज ऐतिहासिक ठेव्याचे रूप घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध 'जगदंबा' आणि 'भवानी' या तलवारींसारख्या प्रकारात धोप तलवारी मोडतात. मराठा सैनिकी रणनीती आणि शस्त्रास्त्रांचा अभ्यास करून अशा तलवारी घडवल्या गेल्या.
हेही वाचा:
राज्यातील वातावरण बदललं! 'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं, हवामान विभागाचा अंदाज काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
