एक्स्प्लोर

मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री झाले असते; शहाजी बापूंनी सांगितलं लॉजिक, उद्धव ठाकरेंवरही टीका

गंगेचा उगम पवित्र आहे, कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून आला. त्यामुळे शिवसेना देखील पवित्र आहे, कारण बाळासाहेब ठाकरेंपासून तिचा उगम आहे.

सोलापूर : शिवसेना बंडानंतर गुवाहटीत जाऊन फेमस झालेले माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji bapu patil) यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री काळातील कामाचे कौतुक करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. गत विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांना पराभवाचा फटका बसला, दुसरीकडे राज्यात महायुतीचं सरकार आले, पण एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. त्यावरुन, शहाजी पाटील यांनी सोलापुरात जोरदार फटकेबाजी केली. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पराभवाचे दु:ख व्यक्त करताना वेगळंच लॉजिक मांडल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही, मी निवडून यायला पाहिजे होते. मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. कारण मी 1995 ला निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मी 2019 ला निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, असं लॉजिक माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी लावलं. तसेच, माझी रास शिवसेनेची आहे, पण मी पूर्वी कसा काय काँग्रेसमध्ये गेलो होतो मला माहिती नाही, असेही शहाजी बापूंनी म्हटले.

गंगेचा उगम पवित्र आहे, कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून आला. त्यामुळे शिवसेना देखील पवित्र आहे, कारण बाळासाहेब ठाकरेंपासून तिचा उगम आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना मागे पडली.सोलापूर जिल्ह्यात मागील दोन वर्षात पक्षाची सूत्र दुसऱ्यांकडे गेली, त्यामुळे पक्षाची पीछेहाट झाली. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वासाठी आपली लढाई आहे. तुम्ही आम्ही जसे मावळे आहोत, तसेच मावळे त्यावेळी पानिपतला जाणारे होते. राज्याच्या कानकोपऱ्यात लोक म्हणतात, एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. मागील दोन वर्षात एकनाथ शिंदे यांनी खूप कष्ट घेतले. 

उद्धव ठाकरेंवर आयोडेक्स लावायची वेळ

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात न भूतो न भविष्यती महाराष्ट्राचा ऐतिहासिक निकाल लागला. पवार साहेबांसारख्या माणसाचे केवळ 10 लोक निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या हाताला तर आयोडेक्स लावायची वेळ आली होती. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंचं कौतुक करत शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 

तानाजी सावंत यांच्यावरही टीका

तानाजी सावंत हे मोठ्या शिक्षण संस्था चालवतात, पाच-सहा कारखाने सुद्धा झाले आहेत. काही कारखाने त्यांना आणखी खरेदी करायचे आहेत, अशा व्यापामध्ये गुंतल्याने त्यांचे पक्ष कार्यात कमी लक्ष असल्याची खोचक टीका शहाजी बापू पाटील यांनी केली. त्यामुळे एक प्रकारे शिंदे गटातील दोन नेत्यांमध्येच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून तानाजी सावंत हे पक्षावर नाराज असल्या चर्चा आहे. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याकडे देखील तानाजी सावंत यांनी पाठ फिरवल्याने राजकीय भूवया पुन्हा उंचावल्या, त्यामुळे तानाजी सावंत यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. 

हेही वाचा

'राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ', पंतप्रधान मोदींनी मराठीत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather : मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नका, पुढचे चार दिवस अरबी समुद्र खवळणार; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन
मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नका, पुढचे चार दिवस अरबी समुद्र खवळणार; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन
IPL 2025 : प्लेऑफ मॅचेसची ठिकाणं ठरली, आयपीएल फायनल 'या' मैदानावर होणार, BCCI नं केली मोठी घोषणा
आयपीएल फायनल अहमदाबादमध्ये होणार, बीसीसीआयनं हेच ठिकाण का निवडलं? कारण समोर
पुण्यात 2 तासांच्या पावसाने उडवली दाणादाण; हिंजवडी, कात्रज परिसरात पाणीच पाणी, दुचाकी गेल्या वाहून
पुण्यात 2 तासांच्या पावसाने उडवली दाणादाण; हिंजवडी, कात्रज परिसरात पाणीच पाणी, दुचाकी गेल्या वाहून
एकनाथ शिंदेंनी टाकला विश्वास; पुण्याच्या रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत मोठी जबाबदारी, पत्र जारी
एकनाथ शिंदेंनी टाकला विश्वास; पुण्याच्या रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत मोठी जबाबदारी, पत्र जारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 20 May 2025Samadhan Munde vs Shivraj Divate : शिवराज दिवटेने आधी माझ्या मुलाला मारलं!बीड प्रकरणात ट्वीस्ट!Prataprao Chikhlikar : अजितदादांना फोनकरुन माफी मागितली, मटका किंगला पक्षातूल काढून टाकलं!Laxman Hake on Pawar Family : पवार परिवार सत्तेशिवाय राहू शकत नाही, लक्ष्मण हाकेंचा जोरदार घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather : मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नका, पुढचे चार दिवस अरबी समुद्र खवळणार; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन
मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नका, पुढचे चार दिवस अरबी समुद्र खवळणार; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन
IPL 2025 : प्लेऑफ मॅचेसची ठिकाणं ठरली, आयपीएल फायनल 'या' मैदानावर होणार, BCCI नं केली मोठी घोषणा
आयपीएल फायनल अहमदाबादमध्ये होणार, बीसीसीआयनं हेच ठिकाण का निवडलं? कारण समोर
पुण्यात 2 तासांच्या पावसाने उडवली दाणादाण; हिंजवडी, कात्रज परिसरात पाणीच पाणी, दुचाकी गेल्या वाहून
पुण्यात 2 तासांच्या पावसाने उडवली दाणादाण; हिंजवडी, कात्रज परिसरात पाणीच पाणी, दुचाकी गेल्या वाहून
एकनाथ शिंदेंनी टाकला विश्वास; पुण्याच्या रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत मोठी जबाबदारी, पत्र जारी
एकनाथ शिंदेंनी टाकला विश्वास; पुण्याच्या रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत मोठी जबाबदारी, पत्र जारी
शेतात वीज कोसळून कांद्याची बराख जळाली, आग विझवण्यासाठी बळाराजाची धावाधाव; वादळवाऱ्यात मोठं नुकसान
शेतात वीज कोसळून कांद्याची बराख जळाली, आग विझवण्यासाठी बळाराजाची धावाधाव; वादळवाऱ्यात मोठं नुकसान
कोकणात दरडी कोसळल्या, रेल्वे ट्रॅकवरच मोठमोठे दगड; जनशताब्दीसह अनेक रेल्वेगाड्या अडकल्या
कोकणात दरडी कोसळल्या, रेल्वे ट्रॅकवरच मोठमोठे दगड; जनशताब्दीसह अनेक रेल्वेगाड्या अडकल्या
साताऱ्यात मोबाईल टॉवर कोसळलं, नाशकात झाड उन्मळून पडलं; पुणे, मुंबईसह राज्यभरात मुसळधारा, सोसाट्याचा वारा
साताऱ्यात मोबाईल टॉवर कोसळलं, नाशकात झाड उन्मळून पडलं; पुणे, मुंबईसह राज्यभरात मुसळधारा, सोसाट्याचा वारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे  2025 | मंगळवार
Embed widget
OSZAR »