Mohan Bhagwat : मूळ धर्मात परत येऊ इच्छितात, त्यांना आणलंच पाहिजे, पण...; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

Mohan Bhagwat : संघाचे काम मात्र थेंब-थेंब पावसासारखे आहे. ते जमिनीत मुरते, त्यामुळे समाजाचा फायदा होतो, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

Continues below advertisement

Mohan Bhagwat : जे आपल्या मूळ धर्मात परत येऊ इच्छितात, त्यांना आणलेच पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan bhagwat) यांनी केले. तर धर्मांतरण कशाला व्हायला हवं? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

Continues below advertisement

मोहन भागवत म्हणाले की, समाजात मतमतांतर निर्माण होऊ द्यायचे नाही. समाजात काही लोक समाजात भांडण लावणारे, माथी भडकवणारे लोक आहेत. देशात वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळ्या पूजा पद्धतीच्या लोकांमध्ये आपापसात सहयोग करण्याची गरज आहे. त्या ऐक्यामध्येच आपलं हित आहे. सर्वांना आपापले वैविध्य प्रिय आहे. ती विविधता (आपली भाषा, आपली पूजा पद्धती) कायम ठेवत आपले ऐक्य महत्त्वाचे आहे. आपण एकच आहोत, आपले पूर्वज एक आहेत. इंग्रजानी आपल्यात भ्रम निर्माण केले. ऐक्याच्या आधारावर विकासाचे पथ (मार्ग) निर्माण करणे आवश्यक आहे. विकास आणि पर्यावरण यांच्यात अंतर्विरोध का? दोन्ही एकासोबत चालू शकत नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

धर्मांतरण कशाला व्हायला हवं?

मोहन भागवत पुढे म्हणाले की,  आदिवासी आमचेच आहेत. तुम्ही आदिवासी कोडची गोष्ट काढली. तुम्ही आदिवासींसाठी संघाची मदत मागितली, अशी मदत मागायची गरज नाही. आदिवासी आमचेच आहेत. संघ संपूर्ण हिंदू समाजासाठी काम करणारे संघटन आहे. तुम्ही आदिवासी संदर्भात ज्या बाबतीत संघाची मदत मागितली, ते शासनापर्यंत पोहोचून जाईल. शासन आपलं काम करेल, तिथे काही वेळ लागतो.  धर्मांतरण कशाला व्हायला हवं? जे आपल्या मूळ धर्मात परत येऊ इच्छितात, त्यांना आणलेच पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे हे विचार आदिवासीमधून आपल्याला मिळाले आहे. 
आपण हिंदू आहोत हेही त्याच्यातूनच आलंय, असे त्यांनी म्हटले. 

संघाचे काम मात्र थेंब-थेंब पावसासारखे 

1925 मध्ये संघ स्थापन झाला, तेव्हा संघासंदर्भात समाजातील वातावरण कसं होतं? लोकांचे विचार कसे होते? आज संघ 100 वर्ष पूर्ण करत असताना समाजाचा संघाबद्दलचा विचार कसा आहे? हे पाहिले पाहिजे. सावरकर म्हणाले होते की, आमचे काम मुसळधार पावसासारखे आहे. मात्र त्याचा हवा तसा फायदा होत नाही. संघाचे काम मात्र थेंब-थेंब पावसासारखे आहे. ते जमिनीत मुरते, त्यामुळे समाजाचा फायदा होतो.   

समस्या पूर्णपणे संपलेली नाही

पहलगाममध्ये मोठा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी आपल्या देशात येऊन आपल्या नागरिकांना मारले. म्हणून सगळ्यांच्या मनात दुःख आणि क्रोध होता आणि कारवाई झाली. आपल्या सैन्याची क्षमता आणि वीरता सर्वांसमोर आली. संरक्षण क्षेत्रात आपले वेगवेगळे संशोधन योग्य असल्याचे सिद्ध झाले. शासन, प्रशासनाची दृढता आपण यावेळी पाहिली. राजकीय पक्षांमधील समजूतदारपणा आणि सहकार्य आपण पाहिलं. ही स्थिती आपल्या देशात कायम राहिली पाहिजे. मात्र, समस्या पूर्णपणे संपलेली नाही, तिरसटपणा जोवर कायम आहे, द्विराष्ट्रवादाचा भूत जोवर डोक्यात स्वार आहे. तोवर समस्या कायम राहणार आहे. युद्धाची पद्धत बदलली आहे. समोरासमोर लढू शकत नाही म्हणून "थाऊजंड कट्स"ची पॉलिसी म्हणजेच दहशतवादाला पोसणं हे त्यांचे धोरण आहे. कोण आपलं आणि कोण स्वार्थी याची परीक्षाही झाली. एक गोष्ट निश्चित झाली, आत्मरक्षणासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हावेच लागणार आहे. नवीन तंत्रज्ञानासह संशोधन होणे आवश्यक आहे.  सेना, शासन, प्रशासन हे सर्व करेलच. पण खरं बळ समाजाचं असतं. इंग्लंडने हिटलरविरोधात जे करून दाखवलं, त्यावरून समाजाचं बळ हेच खरं बळ आहे हे स्पष्ट होतं, असे मोहन भागवत यांनी यावेळी म्हटले.  

आणखी वाचा 

महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा, संतोष देशमुख यांचं कुटुंब रायगडावर दाखल

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »