ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, दोन भावांमधील दुराव्यानं किरीट सोमय्या, कंगना राणावतसारख्या परप्रातीयांची दादागिरी वाढली; राज ठाकरेंना मनसैनिकांची 'मनसे' साद
गेल्या काही दिवसांपासून मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये दोन भावांच्या मनोबिलनाची चर्चा जोरदार सुरू आहे. इतकेच नव्हे तर या दोन भावांनी एकत्र यावे अशी महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाची सुद्धा भावना आहे.

Uddhav & Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकत्र येण्याविषयी संकेत दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एका जाहीर कार्यक्रमांमध्ये एकत्र येण्याचे संकेत दिले. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव आणि राज एकत्र येणार याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र, अजूनही याबाबत स्पष्टता मात्र आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये दोन भावांच्या मनोबिलनाची चर्चा जोरदार सुरू आहे. इतकेच नव्हे तर या दोन भावांनी एकत्र यावे अशी महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाची सुद्धा भावना आहे. मात्र, पुढाकार कोण घेणार याबाबत मात्र अजूनही स्पष्टता आलेली नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर आज मनसैनिकांनी राज ठाकरे यांना शिवतीर्थावर भेट 'मनसे' साद घातली. यावेळी बोलताना मनसैनिकांनी राज्यामध्ये ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, दोन भावांमधील दुराव्यानं किरीट सोमय्या कंगना राणावत सारख्या परप्रांतीयांची राज्यात दादागिरी वाढली असल्याचे राज ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.
महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकावा
महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकावा, अशी भूमिका केंद्रीय समितीमधील पदाधिकाऱ्यांनी व्यक केली आहे. केंद्रीय समितीचे अध्यक्ष संजय जामदार यांनी राज ठाकरेंसोबत भेट झाल्यानंतर म्हणाले की, राज ठाकरेंसोबत बैठक झाली. राज्यात परप्रांतियांची दादागिरी वाढली आहे. राज्यात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे. दोन भावांमध्ये फूट असल्याने किरीट सोमय्या, कंगना राणावतसारख्यांची दादागिरी वाढली आहे, अशी राज्यातील जनतेची भावना असल्याचे ते म्हणाले. याला दोन भावातील फूट कारणीभूत असल्याने हे थांबलं पाहिजे. राज ठाकरे यांनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज ठाकरे हे मनसैनिकांची भूमिका जाणून घेत आहेत. त्यांनी युतीसंदर्भात जाहीर चर्चा करू नका, असे पक्षातील नेत्यांना सांगितले आहं. दुसरीकडे आज मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी एक कॉल करावा, राज ठाकरे शंभर पावले पुढे येतील असे म्हणत एक प्रकारे युतीसाठी बोलणी करण्यासाठी आवाहन केलं. संदीप देशपांडे म्हणाले, संजय राऊत कॅमेरासमोर जसे दाखवत होते, तसे मागे देखील त्यांनी सकारात्मकता दाखवावी. याआधी 2017 साली ते कॅमेरामागेच सकारात्मक होते. मात्र, युती पुढे गेली नाही, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
