मी खासगीकरणाचं नाही तर सहकाराचं समर्थन करतो, अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला
मी फुले, शाहू आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. कुठे डाग पडेल असं आजपर्यंत कधी मी काम केलं नसल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

Ajit Pawar : मी फुले, शाहू आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. कुठे डाग पडेल असं आजपर्यंत कधी मी काम केलं नसल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्ताने बारामती तालुक्यातील सांगवी गावात प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार बोलत होते. मी खासगीकरणाचे समर्थन करत नाही. मी सहकाराचं समर्थन करतो. म्हणून एकदा मला चेअरमन व्हायचंय, मला दाखवून द्यायचा आहे की कसा चढता भाव मी पाच वर्षात देईन.
मी भ्रष्टाचाराला थारा देणार नाही. मी चांगला कारखाना चालवून दाखवील असे अजित पवार म्हणाले.माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या पोटात आलाय गोळा आला आहे. ते म्हणतात ब वर्गातून चेअरमन होता येत नाही त्यांना म्हणावं सहकार खातं बघितले का कुणाकडे? असा टोला देखील अजित पवारांनी विरोधकांना लगावला.
वय झाल्यावर कुठेतरी थांबलं पाहिजे
पॅनल टू पॅनल मतदान करा तुम्ही तुमचा काम चोख करा मग मी पाच वर्षात तुमचं काम चोख करेल असेही अजित पवार म्हणाले. पोलिसांचं काम कोणाला कसं लागतं माहित नाही त्यामुळे माझ्या माध्यमातून तुम्हाला मदत होईल. मी ऑल इन वन आहे. आमच्या पॅनलचा चेअरमन ठरलेला आहे, बाकीच्या तीन पॅनेलच्या लोकांनी सांगावं की हा चेअरमन आहे आमचं ठरलं तर त्यांनी सांगावं असेही अजित पवार म्हणाले. जास्त जागा आल्या भाजपचा मुख्यमंत्री झाला. वय झाल्यावर कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही पायजम्यावरुन लुंगी वर आला त्रास होतोय म्हणूनच आला ना? मी कोजनला दीड रुपये अनुदान दिले. हे मी करू शकतो ते समोरच्या पॅनल मधलं कोणी करू शकता का? त्यांच्या हातात काही आहे का? असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. शेवटी राहिलेल्या दोन-तीन दिवसात अफवा उठतील. महाराष्ट्रामध्ये कारखानदारीची अवस्था काय आहे तुम्हाला माहित आहे मी फोडून जास्त सांगत नाही असे अजित पवार म्हणाले.
कपबशी चिन्हावर शिक्का मारून पॅनल टू पॅनल निवडून द्या
मी तुम्हाला पाणी व्यवस्थित देईल, आम्ही सरकारमध्ये आहोत. मागच्या वर्षी 21 पैकी 18 जण आमचे निवडून आले होते. विरोधातले तीन जण आले त्यातले एक जण सुद्धा पाच वर्षात कारखान्यात गेले नाहीत. आम्ही विरोधात होतो तेव्हा आम्ही घरी बसलो नाही. आम्ही विरोधी पक्षात बसलो. सत्ता आली तर सत्तेत बसलो. जेव्हा सत्तेत आलो नाही तेव्हा विरोधात बसलो. त्यामुळं कपबशी चिन्हावर शिक्का मारून पॅनल टू पॅनल निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या: