Maharashtra Live: अजित पवारांच्या विरोधातील पॅनेलचा सेनापतीच पडला, अजितदादा विरोधकांना 21-0 व्हाईटवॉश देणार?
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी आणि घडामोडींचे ताजे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यातील पावसाची स्थिती काय, राजकीय घडामोडींना वेग
LIVE

Background
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात. सिल्लोड रोडवरील घटना. धाब्यावर जेवणासाठी रात्री संभाजीनगर येथून पाच मित्र फुलंब्री येथे गेले होते. रात्री जेवण करून परतत असताना अपघात . अपघात तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमी तरुणानाना घाटी मध्ये दाखल .सर्व तरुण 15 ते 18 वर्षांचे होते. हा अपघात नेमका कशामुळे घडला हे अद्याप कळालेले नाही.
एक इंचही जमीन शक्तिपीठ साठी देणार नाहीत, परभणीत शक्तिपीठबाधीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची होळी करत केले बोंबाबोंब आंदोलन
एक इंचही जमीन शक्तिपीठ साठी देणार नाहीत
एक तर तुम्ही राहताल आणि तर आम्ही
परभणीत शक्तिपीठ बाधीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची होळी करत केले बोंबाबोंब आंदोलन
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला राज्यभरामधून विरोध होतोय त्यातच काल मुख्यमंत्र्यांनी सक्तीने जमीन अधिग्रहण करण्याचा आदेश दिल्याचा आरोप करत या आदेशाची होळी परभणीत शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी केलीये तसेच सरकारच्या या धोरणाचा बोंबाबोंब करत निषेधही केलाय महत्त्वाचं म्हणजे आम्ही सरकारने कितीही सक्ती केली तरीही एक इंच ही जमीन देणार नसल्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय.अधिकारी मोजणी साठी जर शेतात आले तर एक तर अधिकारी राहतील नाही तर शेतकरी राहतील असा इशाराही यावेळी दिलाय परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार बोंबाबोंब करत सरकार विरोधात घोषणाबाजी ही केलीय..
Air India विमान अपघातानंतर महत्त्वाच्या शहरांमधील विमानतळांच्या सुरक्षेची पाहणी
नवी मुंबई -
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाला झालेल्या अपघातानंतर महत्त्वाच्या शहरांमधील विमानतळांच्या सुरक्षेची पाहणी
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षितते संदर्भात आढावा घेण्यासाठी विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य विमानतळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी दाखल.
सिडको आणि अडाणी यांच्यामार्फत करण्यात येत असलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या कामाचा दर्जा आणि प्रगतीबाबत घेणार आढावा
सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यासह १५ आमदार सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी विमानतळावर दाखल .
या समितीमध्ये राइस शेख, निलेश राणे, निरंजन डावखरे, धर्मराव बाबा आत्राम, मिलिंद नार्वेकर, वरून सरदेसाई, सुलभ खोडके, विलास भुमरे, अभिजित वंजारी यांचा समावेश
भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळीवर ताव मारणारी माणसं ही प्रवृत्ती रावणाची, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले..
अमरावती
बच्चू कडू बाईट
विधवा महिलांना पैसे नाही दिव्यांगाने पगार नाही एमआरजीचे पैसे नाही कर्जमाफी म्हणताना तिजोरी दाखवता.
पण चार हजाराचा ताट आमदार आणि खासदार समोर मांडताना तेव्हा तुम्हाला बजेटचा आकडा दिसत नाही का..
भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळीवर ताव मारणारी माणसं ही प्रवृत्ती रावणाची प्रवृत्ती आहे
एकीकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे. रोज शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात आणि आमचे आमदार खासदार तांब्याच्या आणि चांदीच्या ताटात चार चार हजाराचं जेवण खातात..
सत्ताधाऱ्यांना मतदाराचे भय राहल नाही का.. पाच वर्षे नंगानाच केला तरी वेळेवर धर्मावर मत मिळते ही मानसिकता आहे...
ऑन आणीबाणी
आणीबाणीच आम्ही समर्थन करत नाही पण ज्यांनी आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना मला काही सांगायचं आहे.
सौ चुहे खाके बिल्ली हजको जाती है तो गलत आहे.
तुम्ही काय केलं एकही ईडीची कारवाई भाजपच्या माणसावर का झाली नाही ही चुपी आणीबाणीच आहे ही स्पष्ट आहे.
ती फिजिकली तारीख होती तुमची चुपी आणीबाणी आहे.
विरोधात बोललो तर जेल मध्ये टाकणार आंदोलन केलं तर बँकेचे पद काढणार ही आणीबाणीचा आहे.
आणीबाणीवर बोलायचा अधिकार भाजपला नाही तो त्यांनी गमावला आहे.
भाजपमध्ये एकही भ्रष्टाचारी नाही का सर्व हरिश्चंद्राची अवलाद आहे.
भाजपची आणीबाणी त्या सारखीच ही छुपी आणीबाणी निषेधार्थ आहे
वेळ आल्यावर शडही काढू आणि यंत्रही काढू.
ऑन कृषिमंत्री
कृषिमंत्र्यावरच तेरा कोटी रुपये कर्ज आहे त्यांच्याच मूळ त्यांची बँक तोट्यात आहे..
कोकाटेने शेतकऱ्यांना कर्ज भरायचा सल्ला देऊ नये. त्यांनी कर्जमाफीसाठी भांडले पाहिजे नाहीतर आम्हाला पुन्हा तुम्हाला घेराव लागेल
कोकाटे कर्जमाफीत बसणार नाही ती अपात्र आहे
..म्हणून अजित दादांच्या भेटीला जाता आलं नाही- आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर
Anc - अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप सातत्याने हिंदुत्वाचा मुद्दा मांडत अनेक आंदोलनामध्ये सहभागी होत असतात त्यातच त्यांनी अक्कलकोट येथे भाषणामध्ये केलेल्या वादग्रस्त वास्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत... जगताप यांच्या वक्तव्याबद्दल काही जणांनी अजित पवारांकडे तक्रार केली आहे, यावर अजितदादांनी देखील राष्ट्रवादी पक्ष धर्मनिरपेक्ष असून संग्राम जगताप यांच्याशी बोलून त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे म्हटलं... मात्र संग्राम जगताप आपल्या वक्तव्यावर ठाम असून वेगळ्या विचाराचे लोक तक्रार करत असतील तर त्या वक्तव्याबद्दल अजितदादांशी बोलू अस म्हटलं आहे... सोबतच बैठकीला येणार नसल्याबाबत मी कळवलं होतं सध्या दिंड्यां सुरू आहेत... वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आम्ही आहोत त्यामुळे बैठकीला जाता आलं नाही असे स्पष्ट करण संग्राम जगताप यांनी दिलं.
पोलीस पत्नीचा गणवेश परिधान करून पतीने अनेकाना गंडवले; तोतया पोलिसाला नाशिक शहर पोलिसांनी केली अटक
पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचे गणवेश परिधान करून नाशिक शहरासह अनेक ठिकाणी फसवणूक करणाऱ्या बनावट पोलिसाला (तोतया पोलिसाला) अखेर नऊ महिन्यांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलीय. सागर दिगंबर पवार असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली आहे. तोतया पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक पत्नीचा वर्दीचा वापर करत होता. या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातला आहे पोलीस पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचे भासवत होता. नऊ महिन्यापासून सागर पवार हा फरार होता अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सापळा रचून पथकाने संशयित सागरला शिताफीने अटक केलीय.