Maharashtra Live Blog: माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रत्येक क्षणाचे वेगवान अपडेटस्, शरद पवार-अजित पवारांमध्ये कोणाची सरशी?
Maharashtra Live Blog updates: राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी, पाऊस, राजकीय घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा.
LIVE

Background
Maharashtra Live Blog updates: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नीलकंठेश्वर पॅनल उभा करण्यात आले. उपमुख्यमंत्री स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सहकार महर्षी व भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार बचाव पॅनल तर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढले जाणार बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी पॅनल असे एकूण चार पॅनल 21 जागांसाठी निवडणुकीच्या मैदानात आहेत. 21 जागांसाठी तब्बल 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात रिंगणात आहेत. सकाळी 9 पासून मतमोजणीला सुरुवात होईल 34 टेबल वरती दोन राउंड मध्ये ही मतमोजणी होणार आहे एकूण 88.48% मतदान झालेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता राखणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. (Malegaon sahakari sakhar karkhana election 2025)
महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीस सुरुवात
महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीस सुरुवात
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण बैठकीत उपस्थित
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व मंत्री हसन मुश्रीफ बैठकीत मुद्दे मांडणार
शिवसेनेकडून मंत्री शंभुराज देसाई व उदय सामंत करणार खलबते
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व महामंडळ वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता
कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह भाजप, ताराराणी आघाडीला धक्का
कोल्हापूर ब्रेकिंग
कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह भाजप, ताराराणी आघाडीला धक्का
काँग्रेससह, भाजप ताराराणी आघाडीचे आजी-माजी नगरसेवक यांचा थोड्याच वेळात शिवसेना शिंदे गटात होणार प्रवेश
काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, 2 माजी महापौर, 20 नगरसेवक शिवसेनेत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज जेजुरी मुक्कामासाठी दाखल
Anc
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज जेजुरी मुक्कामासाठी दाखल झालाय... जेजुरी येथे आल्यावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथावर जेजुरीकरांनी भंडाऱ्याची उधळण केली.... जेजुरी येथील ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचा मोठ्या उत्साहात स्वागत केले.. जेजुरी येथे शैव आणि वैष्णवांची भेट होते. आज वारीसोळ्यात सहभागी असलेल्या लाखो वैष्णवजणांनी जेजुरीच्या खंडोबाचं म्हणजेच महादेवाचे दर्शन घेतलय.... तर जेजुरी येथे असलेल्या शिवभक्तांनी माऊलींचे दर्शन घेतलय... संत ज्ञानेश्वर माऊलींच शिवभभक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलय.. पिवळ्या भंडाऱ्यान माऊलींचा रथ नाहून निघाला...' येळकोट येळकोट, जय मल्हार' आणि 'माऊली माऊली' असा गजर करत खंडोबाच्या जेजुरी नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले...माऊलींचा आजचा मुक्काम जेजुरी येथे असून उद्याचा मुक्काम हा वाल्मिकीची नगरी असलेल्या वाल्हे गावात असेल... उद्या सकाळी हा सोहळा वाल्हे मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे.
शीव व बेलासिस उड्डाणपुलांची कामे गतीने, विहित कालमर्यादेत पूर्ण करा,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश
*शीव व बेलासिस उड्डाणपुलांची कामे गतीने, विहित कालमर्यादेत पूर्ण करा*
*अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश*
* *दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत शीव (सायन) उड्डाणपूल आणि दिनांक १५ डिसेंबर २०२५ पर्यंत बेलासिस उड्डाणपुलाची कामे पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित*
*• पोलीस सह आयुक्त (वाहतूक) श्री. अनिल कुंभारे यांच्या उपस्थितीत शीव (सायन) व बेलासिस पूल या रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल प्रकल्पांचा आढावा*
*• बृहन्मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलिस व रेल्वे विभागांच्या अधिकाऱयांची संयुक्त बैठक संपन्न*
मुंबई महानगर क्षेत्रातील शीव (सायन) व बेलासिस उड्डाणपुलांच्या कामांना वेग मिळत असून, ही कामे गतीने आणि नियोजनबद्ध रितीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. रेल्वे प्रशासनासह समन्वय साधत कामांचे सुयोग्य नियोजन करावे. महानगराच्या दळणवळण व्यवस्थेत या पुलांचा मोलाचा वाटा असून, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे. सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण होतील, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दिनांक १५ डिसेंबर २०२५ पर्यंत बेलासिस आणि ३१ मे २०२६ पर्यंत शीव (सायन) उड्डाणपुलाची कामे पूर्ण झाली पाहिजेत, अशी ठोस कालमर्यादा देखील श्री. बांगर यांनी निश्चित केली आहे.
शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणारा शीव (सायन) उड्डाणपूल आणि ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी या दोन्ही प्रकल्प कार्यस्थळास काल, (दिनांक २३ जून २०२५) प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीचा स्वतंत्रपणे आढावा घेतला. तसेच, आज (दिनांक २४ जून २०२५) बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेत विविध निर्देश दिले.
पोलीस सह आयुक्त (वाहतूक) श्री. अनिल कुंभारे, डी विभागाचे सहायक आयुक्त श्री.मनीष वळंजू, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. विनायक विसपुते, महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) श्री. उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (शहर) श्री. राजेश मुळे यांच्यासह मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता (निर्माण) श्री. रोहित मेहला, सहायक अभियंता (निर्माण) व्ही. व्ही सतिशन यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होते.
श्री. अभिजीत बांगर म्हणाले की, शीव पुलाच्या दक्षिण बाजूकडील पादचारी पुलाचे (FOB) काम रेल्वे विभागामार्फत सुरू असून ते दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल. त्यानंतर म्हणजे, दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ नंतर मुख्य पुलाच्या दक्षिणेकडील भागाच्या तोडकामास सुरूवात केली जाईल. त्याचवेळी पुलाखालील जुन्या पुलाच्या भिंतीचे तोडकामदेखील सुरू केले जाईल.नोव्हेंबर महिन्यात उत्तर भागातील तर, जानेवारी महिन्यात दक्षिण भागातील तुळया स्थापित (Girder Launching) करण्यात येतील. त्यानंतर रेल्चे हद्दीतील इतर कामे पूर्ण केली जातील. पोहोच मार्गापैकी (Approach Road) पश्चिमेकडील पोहोच मार्ग अधिक महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा (Critical) आहे. पैकी लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्ग (Public Underpass) पूर्णत्वास आला आहे. त्या पोहोच मार्गाचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल. दिनांक १ ऑक्टोबर २०२५ पासून दुस-या भुयारी मार्गाचे (Public Underpass) काम हाती घेण्यात येईल. धारावी आणि लाल बहादूर शास्त्री मार्गाकडे जाणा-या पोहोच रस्त्यांची कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे हद्दीतील कामे दिनांक १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करून संपूर्ण पोहोच मार्ग बृहन्मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध करून दिला जाईल. पूर्वेकडील उर्वरित पोहोच मार्गाचे काम १५ दिवसात पूर्ण करून शीव उड्डाणपूल दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, असे देखील श्री. बांगर यांनी नमूद केले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर पुढे म्हणाले की, बेलासिस पूल प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पूल बांधकामास अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटविण्यासाठी पर्यायी घरांचे वाटप करण्यात आले आहे. सदर बांधकामे हटविण्यासंदर्भातील कार्यवाही विभागीय कार्यालयामार्फत सुरू आहे. पुलानजीकच्या एका गृहनिर्माण संस्थेची (Housing Society) सीमाभिंत बाधित होत असून ती मोकळी जागा (Set Back) रस्त्यासाठी (Slip Road) आवश्यक आहे. ती जागा उपलब्ध उपलब्ध करून देण्याची कार्यवाही विभागीय कार्यालयामार्फत केली जाणार आहे. रेल्वेच्या तुळया येण्यासाठी नियोजनापेक्षा काही प्रमाणात विलंब झाला आहे. सद्स्थितीत लोखंडी तुळया प्रकल्पस्थळी आल्या आहेत. ३६ मीटर स्पॅनच्या एकूण १२ तुळया स्थापित (Girder Launching) करावयाच्या आहेत. रेल्वे विभागाकडून खंड (Block) मिळाल्यानंतर दोन रात्रींमध्ये प्रत्येकी ६ तुळया स्थापित करण्याची कार्यवाही केली जाईल. तुळया येणे, त्यांची जुळवाजुळव (Assembly) आणि स्थापित करणे आदी कामे दिनांक १० ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर पश्चिम दिशेच्या पोहोच मार्गातील राहिलेल्या एका खांबाचे काम सुरू करण्यात येईल. दिनांक १४ सप्टेंबर २०२५ पर्यंत रेल्वे भागातील काँक्रिट टाकण्याच्या कामासह इतर सर्व कामे पूर्ण केली जातील. त्यानंतर, दोन्ही पोहोच मार्गांची कामे हाती घेऊन एकंदरीत दिनांक १५ डिसेंबर २०२५ पर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होईल, असे नियोजन आहे, असे श्री. अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
थोड्याच वेळात महायुतीच्या समन्वय समितीची बैठक
फ्लॅश
थोड्याच वेळात महायुतीच्या समन्वय समितीची बैठक
पावनगड या शासकीय निवासस्थानी बैठक
भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार
राष्ट्रवादी कडून सुनील तटकरे, तर शिवसेनेकडून उदय सामंत व शंभुराज देसाई लावणार हजेरी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बैठकीत चर्चा अपेक्षित
महायुतीमध्ये एकमेकांवर होणाऱ्या टीकाटिप्पणीवरही होणार खलबतं