Live Blog Updates: दहशतवाद्यांनी आमच्या माथ्यावर वार केला आम्ही त्यांची छाती फोडली; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा
Live Blog 15 May 2025 Todays Breaking News in Marathi: राज्यातील आणि देश-विदेशातील प्रत्येक घडामोड आणि ताज्या बातम्यांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
LIVE

Background
Live Blog 15 May 2025 Todays Breaking News in Marathi: दहशतवाद्यांनी आमच्या माथ्यावर वार केला आम्ही त्यांची छाती फोडली. पहलगामच्या भ्याड हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मारलं, त्यात त्यांचा काय दोष होता? त्यावेळी त्यांनी आमचा धर्म विचारून हल्ला केला, म्हणून आम्ही त्यांचे कर्म बघून बदला घेतला. पाकिस्तान अशा दहशतवाद्यांना आश्रय दिला म्हणून आम्ही पाकिस्तानला भारतीय धर्म दाखवून दिला. असे म्हणत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानला थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे.
आमदार नरेंद्र भोंडेकर यांचं जिल्हा बँकेच्या निवडणुक यादीतून नाव वगळलं
आमदार भोंडेकरांसह अन्य पाच बलुतेदार संस्थांनाही निवडणुकीपासून दूर ठेवलं
संतप्त आमदारांचा जिल्हा बँकेत ठिय्या आंदोलन
Anchor : शासनाकडून कर्ज घेतलेल्या बलुतेदार संस्थांना शासनानं २०१९ मध्येचं कर्ज परतफेड केल्याचं ना हरकत प्रमाणपत्र दिलं. मात्र, आता भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लागल्यानं तब्बल सहा वर्षानंतर बँक प्रशासनानं जिल्ह्यातील पाच बलुतेदार संस्थांवर १ कोटी ३१ लाखांचं कर्ज असल्याचं पुढे करून पाच बलुतेदार संस्थांच प्रतिनिधित्व बँक निवडणुकीपासून नाकारलं. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्यांमध्ये भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा समावेश आहे. यासोबतचं तुमसर, साकोली, पवनी, लाखांदूर आणि मोहाडी या तालुक्यातीलही बलुतेदार संस्थांना निवडणुकीपासून दूर ठेवल्याचं लक्षात येताच संतप्त आमदार नरेंद्र भोंडेकर आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठिय्या आंदोलन सुरू केलय. जोपर्यंत निवडणूक मतदार यादीत नाव समाविष्ट होणार नाही तोपर्यंत बँकेत या आंदोलन सुरू राहील असा निर्वारीचा इशारा आमदार भोंडेकर यांनी बँक प्रशासनाला दिल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.
चालत्या दुचाकीवर वीज कोसळली, शिक्षकाचा रस्त्यातच झाला मृत्यू नांदेडमधील घटना
खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्याने वीज पडल्याचा व्यक्त होतोय अंदाज
AR: चालत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडलीय. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात आज दुपारी 3 वाजता विजांच्या कडकडाटात किरकोळ पाऊस झाला. या दरम्यान आपल्या करंजी या गावाकडे शिक्षक संजय पांडे दुचाकीने जात होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली, त्यात संजय पांडे यांचा रस्त्यातच मृत्यू झालाय. दरम्यान, खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्याने त्यांच्या अंगावर वीज पडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पावसाळी वातावरणात मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासन करत असत मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
भोंगेमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार, मुंबई 40% भोंगेमुक्त - किरीट सोमय्या
भोंगेमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार, मुंबई 40% भोंगेमुक्त - किरीट सोमय्या - AVB
-------------------------
Anchor - भोंगेमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार असून मुंबई 40% भोंगेमुक्त झाल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नांदेडमध्ये दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सोमय्या यांनी बैठक नांदेड जिल्ह्यात अवैध बंगलादेशी आहेत का याचा आढावा घेतला. बांगलादेशी नंतर आता भोंगेमुक्तीचे अभियान मी हाती घेतले आहे. मुंबईत एका महिन्याच्या आत शंभर टक्के भोंगेमुक्ती होईल असे सोमय्या म्हणाले.
Byte - किरीट सोमय्या
-----------------------------------
अर्धापूर बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणात महाराष्ट्र स्तरावर चौकशी सुरु, सगळ्या दोषीवर गुन्हे दाखल होतील - सोमय्या
Anchor - अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आलेल्या बनावट जन्म प्रमाणपत्राची चौकशी महाराष्ट्र स्तरावर सुरु असून दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. अर्धापूर ग्रामीण रुग्णलयातून 82 बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावर सोमय्या यांनी ही प्रतिक्रिया दिली. नांदेड जिल्ह्यात अजून कुठे याप्रकारे बनावट प्रमाणपत्र देण्यात आले का याची चौकशी सुरु आहे असे सोमय्या म्हणाले.
Byte - किरीट सोमय्या
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
अँकर
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे
जिल्ह्यातील हिंगोली सेनगाव कळमनुरी या तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये या पावसाने हजेरी लावली असून माळशेलू माळहिवरा या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे या भागामध्ये तब्बल एक तास अवकाळी पाऊस धो धो बरसत होता या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे तर या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला आहे
नालासोपारातील ४१ इमारत प्रकरणात ईडीच्या छाप्यात तब्बल ३२ कोटींचा ऐवज जप्त; महापालिका अधिकाऱ्यांचा सहभाग उघड
विरार :
नालासोपारातील ४१ अनधिकृत इमारतीं प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल दिवसभरात मोठी कारवाई करत १३ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या शोध मोहिमेत वसई-विरार महापालिकेचे नगररचना उपायुक्त वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल ₹८.६ कोटी रोख रक्कम, तसेच ₹२३.२५ कोटी रुपये किंमतीचे हिरेजडित दागिने, सोने आणि चांदी जप्त करण्यात आले आहे.
ईडीच्या तपासात उघड झाले आहे की, वसई-विरार महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा उघडपणे राबवण्यात आला होता. बनावट मंजुरीच्या कागदपत्रांद्वारे रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींची उभारणी करण्यात आली. त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांची फसवणूक झाली होती.
ही छापेमारी वसई, नालासोपारा, विरार आणि हैदराबाद येथील विविध ठिकाणी करण्यात आली. या धाडीत एकूण ₹९.०४ कोटी रोख रक्कम, ₹२३.२५ कोटी रुपये किंमतीचे हिरेजडित दागिने व सोनं-चांदी, तसेच अनेक महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
४१ इमारतींच्या बेकायदेशीर बांधकाम प्रक्रियेमध्ये वसई-विरार महापालिका (VVMC) अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे ईडीच्या जप्त दस्तऐवजांतून स्पष्ट झाले आहे. यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मोठा भांडाफोड झाला आहे.
ईडीकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, इतर संबंधित अधिकारी, बिल्डर आणि दलाल यांच्यावरही कारवाईची शक्यता आहे. या घोटाळ्यामुळे वसई-विरारमध्ये सुमारे २५०० कुटुंबे बेघर झाली असून, प्रकरणाचा सामाजिक आणि आर्थिक परिणामही मोठा झाला आहे.
या धाडसी कारवाईमुळे वसई-विरारमधील प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. ईडीकडून सुरू असलेला तपास आणि मिळालेले पुरावे लक्षात घेता, आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
