आम्हाला पक्ष वाढवायचाय, आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठाकडे माणसं राहणार नाहीत, गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य
आम्हालाही पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळं आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे माणसं राहणार नाहीत असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं.

Girish Mahajan : आम्हालाही पक्ष वाढवायचा आहे. महापालिकेच्या निवडणुका ताकतीने लढवायच्या अहेत. त्यामुळं आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे माणसं राहणार नाहीत असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं आहे. ज्यांना पक्षात घेतले ते देखील निवडून आले आहेत. काही जेष्ठ आहेत. आपापसातले काही वाद असतील तर ते मिटतील असंही गिरीश महाजन म्हणाले. आमच्याकडे मंत्री असलेल्ले अनेकजण मागच्या काळामध्ये टीका करत होते. मात्र आता एकरूप झाले आहेत. आता कळत नाही ते दुसऱ्या पक्षात होते असेही महाजन म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर 'मनपरिवर्तन' होऊन ठाकरे गटात नाराज असल्याचा प्रबळ आंतरिक जाणीव झालेले सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील भाजप (BJP) मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश झाला. सुधाकर बडगुजर मंगळवारी सकाळी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, आता त्यांच्या गाड्या अर्ध्या रस्त्यात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी चक्रावून टाकणारे विधान केले आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविषयी माझ्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले होते. याबाबत देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचं काही मिसकम्युनिकेशन झालं आहे. हे मी मान्यच करतो असे महाजन म्हणाले. हरकत नही घरचा कार्यक्रम आहे. ते मला तारीख माहित नाही असं बोलले असतील. कारण पक्षप्रवेश एक ते दोन दिवसात होईल असं ठरलं होतं. मात्र लगेच झाल्याने गोंधळ झाल्याचे महाजन म्हणाले.
उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठे पक्ष प्रवेश होणार
माझं कुणावर विशेष प्रेम नाही, माझं माझ्या पक्षावर प्रेम आहे आणि त्याच्या वाढीसाठी मी काम करत असल्याचे महाजन म्हणाले. अजून उत्तर महाराष्ट्रामध्ये बघा, मोठे पक्ष प्रवेश करणार असल्याचे महाजन म्हणाले. तुमच्याकडे कोणी राहायला तयार नाहीत असेही ते म्हणाले. संजय राऊत बोलतात म्हणून लोकं राहायला तयार नाहीत. मी आधीही उद्धवजींना सांगितलं होतं, पक्ष बुडेल म्हणून असे महाजन म्हणाले. सुधाकर बडगुजर हे आमच्या विरोधात लढले. आता ते आमच्याकडे असणारे नेते झालेत. एकवेळी ते आमचे विरोधक होते. त्यामुळे नाराजी लवकरच दूर होईल असे महाजन म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: