मी एकदा दोनदा पाहिल, नाहीतर गावावर फुली मारील, भाजप आमदाराचा थेट मतदारांनाच इशारा
आपल्याला मतदान न करता पाच-दहा कोटी रुपयांचा निधी मिळेल अशी आशा डोक्यातून काढून टाका असे मत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले.
Jalna : भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी थेट आपल्या मतदारांनाच इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये गावातून लीड कमी मिळाल्यामुळं बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) मतदारांवर नाराज झालेत. आपल्याला मतदान न करता पाच-दहा कोटी रुपयांचा निधी मिळेल अशी आशा डोक्यातून काढून टाका असे म्हणालेत. मी एक दोन तीन वेळा पाहिल नंतर गावावर फुली मारील असा इशाराच त्यांनी गावकऱ्यांना दिला.
पाच दहा कोटी मिळतील हे डोक्यातून काढून टाका
जालना तालुक्यातील बोरगावमध्ये लोणीकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या आठ कोटीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच उद्घाटन झालं. यावेळी भाषणात लोणीकरांनी गावकऱ्यानां हा इशारा दिला आहे. विधानसभेत लीड नसल्याने नाराज बबनराव लोणीकर यांनी ग्रामस्थांना कानपिचक्या दिल्या आहेत. जालना तालुक्यातील बोरगावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आठ कोटीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी लोणीकर बोलत होते. 5 वर्षाचे बलुतं, एक फुली द्या नाहीतर नका देऊ. तुम्ही मला नाही दिले तरी पाच दहा कोटी मिळतील हे डोक्यातून काढून टाका असेही लोणीकर म्हणाले.
ट्रेंडिंग
तुमच्या गावात रस्त्यांसाठी आठ कोटी रुपये दिलेत, आता तरी पुढे लक्ष राहू द्या
तुमच्या गावात मी आठ कोटी दिले, तरी या गावात मी मागे कसा? असा सवाल यावेळी लोणीकर यांनी केला. इथं सभामंडप द्या म्हणाले, मी सभामंडप देतो, फिल्टरचा पाणी द्या ते दोतो. डीपी जळाली की सगळ्यांचा फोन येतो. तुमचे टॉपचे गाव होते म्हणून आठ कोटी देऊन ठेवले होते, आता कॅन्सलही करता येईना कमी मतं झाल्यामुळं असे बबनराव लोणीकर म्हणाले. सगळ्या बाजू प्लस असतानाही कमी मते मिळाल्याचे लोणीकर म्हणाले. काड्याची डब्बी देखील काही लोकांनी तुमच्या गावाला दिली नाही असे लोणीकर म्हणाले. मी पाच वर्षातून एकदा एक फुली मागायला येतो. आमचं बलुतं म्हणजे पाच वर्षातून एकदा कमळाच्या फुलाचं बटन दाबायचं, पण तुम्ही तेही केलं नाही असे लोणीकर म्हणाले. आमचे कार्यकर्ते नाराज झाले. या गावाने आम्हाला धोका दिल्याचे लोणीकर म्हणाले. तुमच्या गावात रस्त्यांसाठी आठ कोटी रुपये दिलेत, आता तरी पुढे लक्ष राहू द्या असे लोणीकर म्हणाले. नाहीतर कोणीही येते आणि टीकली हाणून जातात. गेलेले पुन्हा येणार नाहीत तुमच्याकडे, हे काड्याची जबी देखील देणार नाहीत असे लोणीकर म्हणाले. हे लोक पाच वर्ष दिसत नाहीत. निवडणूक आले की छत्रीसारखे उगवतात असे लोणीकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: