एक्स्प्लोर

Bhagwant Mann : दिल्लीत आपची दैना अन् पंजाबमध्ये भगवंत मान 'एकनाथ शिंदे' होण्याच्या मार्गावर? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचा दावा!

भगवंत मान केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत आणि दिल्ली आप युनिटपासून वेगळा मार्ग काढू शकतात असा दावा प्रताप सिंह बाजवा यांनी केला.

Bhagwant Mann : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष आम आदमी पक्ष अपयशी ठरला आहे. या सगळ्यामुळे आता पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. 'आप'च्या दारुण पराभवानंतर आता पंजाबमध्येही पक्षात फूट होण्याची भीती व्यक्त होत आहे. पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा यांनी दावा केला आहे की, मुख्यमंत्री भगवंत मान लवकरच महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांचा मार्ग अवलंबू शकतात. बाजवा म्हणतात की आपचे 30 हून अधिक आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि ते कधीही पक्ष बदलू शकतात.

दिल्लीतील पराभवामुळे आप डगमगली 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयाने आपच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या निवडणुकीत भाजपने 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवला तर आप केवळ 22 जागांवर मर्यादित राहिली. खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्लीतून भाजप उमेदवार परवेश वर्मा यांच्याकडून पराभव झाला. बाजवा यांनी दावा केला की पंजाबमध्ये आप आधीच दोन गटांमध्ये विभागली गेली आहे, एक भगवंत मान यांच्यासोबत आहे आणि दुसरा जो दिल्लीच्या नेतृत्वाशी ताळमेळ ठेवण्यास सक्षम नाही.

भगवंत मान केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या संपर्कात?

भगवंत मान केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत आणि दिल्ली आप युनिटपासून वेगळा मार्ग काढू शकतात असा दावा प्रताप सिंह बाजवा यांनी केला. बाजवा यांनी पंजाब आपचे अध्यक्ष अमन अरोरा यांच्या अलीकडील विधानाचाही उल्लेख केला ज्यात त्यांनी म्हटले होते की पंजाबचा मुख्यमंत्री शीख असणे आवश्यक नाही. बाजवा यांच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल यांची भविष्यात पंजाबच्या राजकारणात प्रवेश करण्याची भूमिका तयार करता यावी, यासाठी दिल्ली नेतृत्वाच्या सांगण्यावरून हे वक्तव्य करण्यात आले आहे. ते म्हणाले की, ते केजरीवाल यांना पंजाबमध्ये पाठवण्याची तयारी करत आहेत. दिल्लीच्या पराभवापूर्वीच त्यांना याची जाणीव झाली होती.

पंजाबमधील आप सरकारवर संकटाचे ढग दाटले आहेत का?

पंजाबमध्ये आपचे सरकार स्थापन झाल्यापासून पक्षाचे अनेक आमदार असमाधानी असल्याचे बोलले जात आहे. बाजवा म्हणाले की, अनेक आमदार गेल्या एक वर्षापासून काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि त्यांना मान सरकारच्या भवितव्याची चिंता आहे. केंद्र सरकारच्या नजरा पंजाबच्या आप सरकारवरही खिळल्या असून आगामी काळात मोठे राजकीय बदल होऊ शकतात, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, दिल्लीतील पराभवानंतर भगवंत मान सरकारला टिकणे कठीण आहे.

खोटे आणि फसवणुकीचे सरकार

सध्या दिल्लीत 'आप'च्या पराभवानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पंजाबमध्ये पक्षावर हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांनी याला खोट्या क्रांतिकारकांचा पराभव म्हटले आहे जे त्यांच्या आश्वासनांवर मागे गेले. भाजप नेते सुभाष शर्मा म्हणाले की, खोट्या आश्वासनांच्या आधारे राज्य जास्त काळ टिकू शकत नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे. सध्या दिल्लीतील दारुण पराभवानंतर पंजाबमध्येही आपची स्थिती डळमळीत झाल्याचे दिसत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Churchgate Station Fire : चर्चगेट स्थानकात शॉर्टसर्किटमुळे आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रणAkola DPDC Meeting Rada : अकोल्यात Thackeray BJP भिडले, नेमकं काय घडलं?MNS Shiv Sena UBT Nashik : मोठी बातमी ! दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलनAjit Pawar Speech Samruddhi: 100-120 वेग,फडणवीसांचं ड्रायव्हिंग;दादा म्हणतात, विम्याची गरज पडली नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
Pakistan : किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती
शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार; काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रेंच्या हाती भगवा
शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार; काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रेंच्या हाती भगवा
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक
Embed widget
OSZAR »