India Pakistan War: पाकिस्तानसोबत आज पुन्हा होणार DGMO स्तरावर चर्चा, लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले,  प्रत्युत्तर देण्याची हीच ती वेळ...

India Pakistan War: भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष आणखी चिघळू नये यासाठी होणाऱ्या व्यवस्थापनावर आज चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचे लष्करी कारवायांचे महासंचालक अर्थात डीजीएमओ आज चर्चा करतील.

Continues below advertisement

India Pakistan War:  भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष आणखी चिघळू नये यासाठी होणाऱ्या व्यवस्थापनावर आज चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचे लष्करी कारवायांचे महासंचालक अर्थात डीजीएमओ आज चर्चा करतील. शनिवारी दुपारी पाकिस्तानने विनंती केल्यावर भारताने कारवाई स्थगित केल्यावर निर्माण झालेल्या स्थितीचाही आज आढावा घेतला जाईल. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यावर भारताने थेट दणका दिल्यावर पाकिस्तानने शनिवारी 3.35 वाजता कारवाई थांबवण्याची विनंती भारताला केली होती. मात्र त्यानंतर काही तासांतच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यावरही भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई हे पाकिस्तानी डीजीएमओ कासीफ अब्दुल्लांना जाब विचारतील. 

Continues below advertisement

लेफ्टनंट जनरल राजीव घई, एअर मार्शल ए. के. भारती आणि व्हाईस मार्शल ए. एन. प्रमोद यांनी नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेत 'ऑपरेशन सिंदूर'ची सविस्तर माहिती दिली. 

जोरदार प्रत्युत्तर देण्याची आता वेळ आली आहे-  लेफ्टनंट जनरल राजीव

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई पुढे म्हणाले की, “22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये 26 लोकांची हत्या करण्यात आली. त्या क्रूरतेची आणि भ्याड पद्धतीच्या हल्ल्याची जगाने दखल घेतली आहे. जेव्हा तुम्ही त्या दृश्यांना आणि हे कृत्य करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्या भयानक राष्ट्राकडे पाहत असताना कुटुंबांना झालेल्या वेदनांना, आपल्या सशस्त्र दलांवर आणि निःशस्त्र नागरिकांवर झालेल्या इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांना एकत्र करता, तेव्हा आम्हाला कळते की एक राष्ट्र म्हणून आमच्या संकल्पातून अधिक जोरदार प्रत्युत्तर देण्याची आता वेळ आली आहे. असेही ते म्हणाले. 

पुढे बोलताना डीजीएमओ म्हणाले की 'ऑपरेशन सिंदूर'ची संकल्पना दहशतवादाच्या "गुन्हेगारांना आणि गुन्हेगारांना पोसणाऱ्याना  शिक्षा करणे" तसेच त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे या स्पष्ट लष्करी उद्दिष्टाने करण्यात आली होती. लेफ्टनंट जनरल घई म्हणाले की, भारताने सीमेपलीकडे दहशतवादी तळ आणि प्रशिक्षण ठिकाणे अतिशय काळजीपूर्वक ओळखली आणि दहशतवादी पायाभूत सुविधांवर अत्यंत अचूकतेने हल्ला केला.

ऑपरेशन सिंदूरची आतापर्यंत समोर न आलेली कहाणी

भारताचं लष्कर, हवाईदल आणि नौदलानं आज संयुक्त पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरची आतापर्यंत समोर न आलेली कहाणी सांगितली. तसंच पुरावे सादर करत पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला. भारतानं केलेल्या स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या बिळात लपलेले 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दहशतवाद्यांचे तळ कसे उद्ध्वस्त केले याचे पुरावेच सादर करण्यात आले.  तसंच भारतानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार झालेत तर भारताचे पाच जवान शहीद झालेत. त्याचबरोबर, भारतीय वायुदलानं पाकिस्तानची काही लढाऊ विमानं देखील हाणून पाडली. मात्र त्यांचा आकडा सांगण्यास वायुदल अधिकाऱ्यांनी नकार दिला.

विशेष म्हणजे शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानच्या डीजीएमओचा फोन कसा आला? 36 तासांचा अवधी असताना दोन तासातच पाकिस्ताननं निरोप कसा दिला याची सविस्तर माहितीच पत्रकार परिषदेत देण्यात आली. पाकिस्ताननं आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर जोरदार कारवाई करण्याचा इशारा देखील भारतानं दिलाय. 

हे ही वाचा 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »