एक्स्प्लोर

India China: पाकिस्ताननंतर आता चीनने भारताला डिवचलं, अरुणाचल प्रदेशमधील जागांची नावं बदलली, भारताचं प्रत्युत्तर, म्हणाला...

India China News: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला होता. चीनने पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची भाषा केली होती.

India China: भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर सीमेवरील वातावरण आता कुठे शांत होते ना तोच आता चीनने भारताची कुरापत काढली आहे. चीनकडून (China) एक नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये चीनने अरुणाचल प्रदेशवर (Arunachal Pradesh) आपला दावा सांगत येथील काही जागांची नावं बदलली आहेत. चीनच्या या कृतीनंतर भारताकडून तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले आहे. चीनचे हे निरर्थक प्रयत्न सत्य बदलू शकत नाहीत, असे भारताने म्हटले.

कोणत्याही परिस्थितीत सत्य बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य अंग होते, आहे आणि राहील, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले. चीनकडून सातत्याने अरुणालच प्रदेश हा दक्षिण तिबेटचा आणि पर्यायाने चीनचा भाग असल्याचा दावा केला जातो. मात्र, भारताने वेळोवेळी चीनच्या या दाव्याचे खंडन केले आहे.

अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचा चीनने केलेला प्रयत्न व्यर्थ आणि हास्यास्पद आहे. आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो. केवळ रचनात्मक नामकरणामुळे अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे सत्य बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले. याबाबत भारताकडून आगामी काळात आणखी काही पावले उचलली जातात का, हे बघावे लागेल.

Pakistan & China: चीनचा पाकिस्तानला पाठिंबा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानी लष्कराने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हवाई हल्ले केले होते. भारताने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत पाकिस्तानी लष्कराचे हवाई तळ उद्ध्वस्त केले होते. या सगळ्यात चीन सातत्याने पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला होता. आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि अखंडता जपण्यासाठी प्रयत्न करु, असे चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले होते. एकीकडे चीनकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता. मात्र, दुसरीकडे दहशतवाद्यांवरील हल्ल्यानंतर भारताविरोधात लढायला उतरलेल्या पाकिस्तानला चीन सातत्याने पाठिंबा देताना दिसत आहे. चीनचा हा दुतोंडीपणा चर्चेचा विषय ठरला होता.

आणखी वाचा

भारताकडून एअर स्ट्राईक; पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणारा चीन भडकला, म्हणाला...

चीनने पुन्हा रंग दाखवला, पाकिस्तानला पाठिंबा दिला; भारताचा जुना मित्र मदतीला धावला, जगातील कोणते देश कोणाच्या बाजूने?

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India China: पाकिस्ताननंतर आता चीनने भारताला डिवचलं, अरुणाचल प्रदेशमधील जागांची नावं बदलली, भारताचं प्रत्युत्तर, म्हणाला...
पाकिस्ताननंतर आता चीनने भारताला डिवचलं, अरुणाचल प्रदेशमधील जागांची नावं बदलली, भारताचं प्रत्युत्तर, म्हणाला...
Anil Deshmukh on NCP Crisis : दादा-ताई एकत्र येतील का, तुमच्या मनात काय? अनिल देशमुख म्हणाले, जवळ या तुमच्या कानात सांगतो...
दादा-ताई एकत्र येतील का, तुमच्या मनात काय? अनिल देशमुख म्हणाले, जवळ या तुमच्या कानात सांगतो...
Yoga for Holistic Health: शारीरिक अन् मानसिक आरोग्यासाठी वरदान ठरतो 'योग', आधुनिक जीवनशैलीचा रामबाण उपाय!
शारीरिक अन् मानसिक आरोग्यासाठी वरदान ठरतो 'योग', आधुनिक जीवनशैलीचा रामबाण उपाय!
Sanjay Raut on Raj Thackeray : राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ, कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत : संजय राऊत
राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ, कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत : संजय राऊत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 News Superfast News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा | 14 May 2025 | ABP MajhaGaja Marne | गुंड गजा मारणेसोबतची मटण पार्टी पोलिसांना महागात, धाब्यावर भेटायला आलेल्यांवरही गुन्हाBR Gavai take oath as Chief Justice : न्यायमूर्ती भूषण गवईंची सरन्यायाधीश म्हणून शपथVijay Shah remark on Sofia Qureshi | कर्नल सोफिया करेशी पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची बहीण - विजय शाह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China: पाकिस्ताननंतर आता चीनने भारताला डिवचलं, अरुणाचल प्रदेशमधील जागांची नावं बदलली, भारताचं प्रत्युत्तर, म्हणाला...
पाकिस्ताननंतर आता चीनने भारताला डिवचलं, अरुणाचल प्रदेशमधील जागांची नावं बदलली, भारताचं प्रत्युत्तर, म्हणाला...
Anil Deshmukh on NCP Crisis : दादा-ताई एकत्र येतील का, तुमच्या मनात काय? अनिल देशमुख म्हणाले, जवळ या तुमच्या कानात सांगतो...
दादा-ताई एकत्र येतील का, तुमच्या मनात काय? अनिल देशमुख म्हणाले, जवळ या तुमच्या कानात सांगतो...
Yoga for Holistic Health: शारीरिक अन् मानसिक आरोग्यासाठी वरदान ठरतो 'योग', आधुनिक जीवनशैलीचा रामबाण उपाय!
शारीरिक अन् मानसिक आरोग्यासाठी वरदान ठरतो 'योग', आधुनिक जीवनशैलीचा रामबाण उपाय!
Sanjay Raut on Raj Thackeray : राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ, कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत : संजय राऊत
राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ, कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत : संजय राऊत
Beed News : राज्यभरात नियुक्त्या, बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांची घोषणा रखडली; पंकजा मुंडे-सुरेश धसांच्या वादाची किनार? चर्चांना उधाण
राज्यभरात नियुक्त्या, बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांची घोषणा रखडली; पंकजा मुंडे-सुरेश धसांच्या वादाची किनार? चर्चांना उधाण
पाकिस्तानचा मित्र तुर्कस्तानसोबत भारताचं युद्ध झालं तर काय होईल? तुर्की सैन्यदल भारतीय लष्करासमोर किती दिवस टिकेल?
पाकिस्तानचा मित्र तुर्कस्तानसोबत भारताचं युद्ध झालं तर काय होईल? तुर्की सैन्यदल भारतीय लष्करासमोर किती दिवस टिकेल?
India Pakistan War : भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असताना मालेगावमधून तरुणाचं संशयास्पद गुगल सर्चिंग, एटीएसनं ताब्यात घेतलं, सहा तास चौकशी
भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असताना मालेगावमधून तरुणाचं संशयास्पद गुगल सर्चिंग, एटीएसनं ताब्यात घेतलं, सहा तास चौकशी
Raigad Crime News: परळीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना, प्रियकराने कोयत्याने वार करुन नर्सला संपवलं, स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला
परळीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना, प्रियकराने कोयत्याने वार करुन नर्सला संपवलं, स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला
Embed widget
OSZAR »