कधी पोट भरण्यासाठी केलं शिवणकाम, मुलीला जन्म देऊन पत्नीनं सोडले प्राण, 13 वर्ष इंडस्ट्रीत खचता खाणारा 'हा' तरुण आज दिग्गज स्टार
Bollywood Actor Struggle Life: सिनेसृष्टीत नशीब आजमावण्यापूर्वी अभिनेता आधी शिवणकाम करुन आपल्या पोटाची खळगी भरत होता. खरं तर त्याला सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती, पण कमी उंचीमुळे त्याचं हे स्वप्न अधुरं राहिलं.

Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूडमधले (Bollywood) सर्वात वरच्या फळीतले अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी स्टारडम गाठण्यापूर्वी फारच मेहनत घेतली, कष्ट घेतले, एवढंच नव्हेतर, आयुष्यात अनेक आव्हानांचा सामनाही केला. त्यापैकी काही नाव आपण सारे जाणतोच, जसं दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत बस कंडक्टर म्हणून काम करायचे, तर सिनेस्टार देव आनंद प्रसिद्ध होण्यापूर्वी एके ठिकाणी क्लार्क म्हणून काम करायचे. असाच एक बॉलिवूडचा अभिनेता (Bollywood Actor) आहे, जो आज घराघरात पोहोचला आहे, पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास फारच खडतर होता. कधीकाळी तर त्यांच्या दोन वेळच्या खाण्याची भ्रांत होती.
सिनेसृष्टीत नशीब आजमावण्यापूर्वी अभिनेता आधी शिवणकाम करुन आपल्या पोटाची खळगी भरत होता. खरं तर त्याला सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती, पण कमी उंचीमुळे त्याचं हे स्वप्न अधुरं राहिलं. त्यानंतर त्यानं जेव्हा पहिली नोकरी धरली, त्यावेळी त्याच्या घरातल्यांनी त्याचं लग्न लावून दिलं. त्यावेळी त्याचं वय जेमतेम 17-18 वर्ष होतं. पण, त्यानंतर अवघ्या दोन वर्षातच त्याच्या पत्नीनं त्याची साथ सोडली. पतीच्या निधनानं अभिनेता पुरता खचून गेलेला.
आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत, तो मूळचा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमधील कुलारा या छोट्या गावातून आला. त्याचं नाव राजपाल यादव. आज हा अभिनेता आपल्या अभिनयासोबतच विनोदी शैलीनं सर्वांना खळखळून हसवतो.
View this post on Instagram
मुलीला जन्म दिला अन् पत्नीनं अखेरचा श्वास घेतला
राजपाल यादव त्याच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंग आणि क्लासी भूमिकांसाठी ओळखला जातो. पण यशाची चव चाखण्यासाठी या अभिनेत्याला खूप संघर्ष करावा लागला. सुरुवातीला त्याच्या उंचीबद्दल अनेकांनी त्याची खिल्ली उडवली, त्याच्यावर टीकाही केली, पण त्यानं जिद्द सोडली नाही, त्यानं त्याच्या प्रतिभेनं आणि त्याच्या कामानं सर्वांची तोंडं गप्प केली. एका जुन्या मुलाखतीत राजपाल यादवनं लग्नानंतर काही वर्षातच त्याच्या पत्नीचं निधन झालं, त्यानंतर त्याला त्याच्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन अंत्यसंस्कार करावे लागले होते.
राजपाल यादवनं लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, "त्याकाळ जर तुमचं वय 20 वर्ष असेल आणि तुम्ही पोट भरण्यासाठी नोकरी किंवा कामधंदा करत असाल तर, तुमच्या घरातले तुमचं लग्न करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करायचे. माझ्या वडिलांनी माझं लग्न ठरवून टाकलं. माझ्या पहिल्या पत्नीनं एका मुलीला जन्म दिलेला, त्यावेळी तिचा मृत्यू झाला. मी दुसऱ्या दिवशी तिला भेटणार होतो, पण त्याऐवजी मला तिच्या मृत्यूची बातमी कळाली. मी तिचा मृतदेह खांद्यावर घेतला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केले. माझं नशीब चांगलं म्हणून माझ्या कुटुंबीयांनी , माझी आई, माझ्या वहिनीनं माझ्या मुलीला सांभाळलं आणि तिला कधीच तिच्या आईची कमतरता भासू दिली नाही."
'या' फिल्ममुळे करिअरला कलाटणी
पत्नीच्या निधनानंतर खचलेल्या राजपाल यादवनं सिनेसृष्टीत नशीब आजमवायचं ठरवलं आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये धडे गिरवायला सुरुवात केली. राजपालचा पहिला सिनेमा 'दिल क्या करे' कुणाच्या लक्षातही आला नाही. पण, राम गोपाल वर्माचा जंगल (2000) मध्ये त्याच्या परफॉर्मन्सन त्याच्या करिअरला कलाटणी मिळाली. त्यानंतर लगेचच प्रियदर्शन यांच्या 'हंगामा'मध्ये त्यांना रोल ऑफर झाला. त्यानंतर मात्र राजपाल यादवनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. पुढे काही वर्षांतच त्यानं हिंदी फिल्म इंडस्ट्रीत एक कॉमेडी स्टार म्हणून आपली जागा तयार केली.
View this post on Instagram
काही काळनं राजपाल यादवनं दुसरं लग्न केलं. आता तो त्याची दुसरी पत्नी राधा आणि दोन मुलींसोबत आनंदात आहे. आपल्या दुसऱ्या पत्नीबाबत बोलताना त्यानं सांगितलं की, "माझे गुरू, माझ्या आई-वडिलांनंतर जिनं मला सर्वात जास्त सपोर्ट केला, ती माझी पत्नी आहे. राधानं माझ्या पहिल्या मुलीलाही आपलंसं केलं, तिला आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे प्रेम दिलं."
महत्त्वाच्या इतर बातम्या :