ट्रेंडिंग
Apara Ekadashi 2025 : अपरा एकादशीच्या दिवशी चुकूनही 'ही' कामे करु नका; अन्यथा...वाचा ज्योतिषशास्त्र
Apara Ekadashi 2025 : वैदिक पंचांगानुसार, यंदा अपरा एकादशी 23 मे 2025 रोजी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
Apara Ekadashi 2025 : हिंदू धर्मात एकादशीला फार महत्त्व आहे. त्यानुसार, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी असतात. यामध्ये भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते आणि उपवास ठेवला जातो. तर, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला अपरा एकादशी म्हणतात.
वैदिक पंचांगानुसार, यंदा अपरा एकादशी 23 मे 2025 रोजी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका होते. मात्र, या व्रताचे देखील काही विशेष नियम आहेत. यांचं पालन करणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे या दिवशी कोणती अशी कामं आहेत जी अजिबात करु नयेत ते जाणून घेऊयात.
अपरा एकादशीचं महत्त्व
अपरा एकादशीचं व्रत ठेवल्याने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णूला तुळस, पंचामृत आणि फळं अर्पित करुन पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते.
अपरा एकादशीच्या दिवशी चुकूनही 'ही' कामे करु नका
तांदळाचे सेवन करु नका
धार्मिक मान्यतेनुसार, एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं वर्जित मानलं जातं. मान्यतेनुसार, एके दिवशी महर्षि मेधा अंश भूमित सामायिक झाले होते जेथून तांदळाचं उत्पन्न झालं. त्यामुळे या दिवशी तांदूळ खाणं अपमानित मानलं जातं.
केस, नखं आणि दाढी कापू नये
एकादशीच्या दिवशी शरीराच्या कोणत्याही भागाचे केस, नखं कापणं वर्जित मानलं जातं. यामुळे व्रताचं पुण्य कमी होतं.
दिवसा झोपू नका
जे कोणी या दिवशी उपवास ठेवतात त्यांनी या दिवशी झोपू नये. याला आळसाचा संकेत मानतात. त्यामुळे या दिवशी दिवसभर देवाचं नामस्मरण करा.
मंदिर स्वच्छ ठेवा
घरातील देव्हाऱ्याची साफसफाई करणं फार गरजेचं आहे. देवाच्या ठिकाणाची जागा कधीच अस्वच्छ ठेवू नये. यामुळे घरात वास्तू दोष लागतो.
केस धुवू नका
अगदीच आवश्यकता नसल्यास या दिवशी केस धुवू नका. जर केस धुवायचेच असतील तर शॅंम्पूचा वापर करु नका.
तेलाने मालिश करु नका
या दिवशी शरीराला तेल लावणं किंवा मालिश करणं वर्जित मानलं जातं. यामुळे या दिवसाची पवित्रता भंग होते असं म्हणतात.
तामसिक भोजनाचं सेवन करा
कांदा, लसूण, मांस आणि जमिनीत वाढणाऱ्या भाज्या जसे की, बटाटा, गाजर इत्यादींचं सेवन करु नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: