Bachchu Kadu Amravati Protest : शेतकऱ्यांचा दबलेला आवाज आम्ही बनू...शांततेत आंदोलन करणार - बच्चू कडू
Bachchu Kadu Amravati Protest : शेतकऱ्यांचा दबलेला आवाज आम्ही बनू...शांततेत आंदोलन करणार - बच्चू कडू
उद्या आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राकेश टिकेत सहभागी होणार आहेत.. आपण अनेक आंदोलन केले आता अन्नत्याग आंदोलन करतोय... सध्या धर्माची लढाई सुरू आहे.. राज्यात मराठा ओबीसी मध्ये खतपाणी घालणं सुरू आहे.. यात आमची हक्काची लढाई किती अवजड होत चालली आहे.. हिंदू मुसलमान आपल्या डोक्यात टाकला जातोय.. जी हवा आहे ती आपल्याला बदलायची आहे.. बच्चू कडू बलिदान द्यायला तयार आहे.. माझ्या कष्टकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे.. ही व्यवस्था बिखरलेली आहे.. बच्चू कडू भाषण करतांना काही वेळासाठी विद्युत पुरवठा खंडित दिव्यांगांना सहा सहा महिने मानधन भेटत नाहीये... सरकार लाडकी बहीण योजना आणली.. सगळ्या शेतकऱ्याच्या मालाचे दर पडले.. सगळ्यांचे पैसे थांबले पण अजितदादाचे पगार थांबले का, आमदार अधिकाऱ्याचे पगार थांबले का.. अन्नत्याग आम्ही मागणी साठी नाहीतर तर लढण्यासाठी आहे.. आम्ही जर चूप बसलो तर प्रहार कशासाठी आहे मग.. हे आंदोलन महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचला पाहिजे.. हे आंदोलन 11 ते 15 दिवस पर्यंत चालू शकतो... मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळ निवडण्याचा कारण की, याची ऊर्जा तुम्हाला मिळाली पाहिजे म्हणून हे स्थळ निवडलं... मला आंदोलन करण्याची काही आवड नाहीये.. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.. शेतकरी प्रश्नावर आपण जागी राहिलो पाहिजे म्हणून हे आंदोलन आहे... IMP 14 तारखेपर्यंत आपण शांततेत आंदोलन करणार आहो पण त्यानंतर वेगळ्या प्रकारची कलाटणी आपण देणार आहो त्यासाठी तयार राहा.




