Jammu And Kashmir Tourism : पर्यटकांची पाठ, संकटाशी गाठ; काश्मीरची आर्थिक घडी विस्कटतेय.. Special Report
Jammu And Kashmir Tourism : पर्यटकांची पाठ, संकटाशी गाठ; काश्मीरची आर्थिक घडी विस्कटतेय..Special Report
२०१९ साली काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं... त्यानंतर गेल्या काही वर्षात तिथलं वातावरण बदललं. रोजगार आले... पर्यटन फुलू लागलं... आणि काश्मीरची भरभराट होऊ लागली. पण पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा काश्मीरला नजर लागली. आणि इथली घडी पुन्हा विस्कटली. हल्ल्यानंतर सर्वात मोठा फटका बसला तो इथल्या पर्यटन उद्योगाला. महिनाभरात जवळपास ९० टक्के बुकिंग्स रद्द करण्यात आल्या. त्यामुळे काश्मीरमध्ये सध्या शुकशुकाट आहे... पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
२२ एप्रिलच्या दुपारी
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेला
दहशतवाद्यांचा हा भ्याड हल्ला...
या हल्ल्यानंतर २६ निष्पाप नागरिकांनी जीव गमावला...
आणि या घटनेनंतर काश्मीरमधल्या पर्यटनावर मोठं संकट कोसळलं....
काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा हाच मुळात पर्यटन आहे...
पण जर पर्यटकच येणार नसतील
तर इथली अर्थव्यवस्था कशी चालणार?
-------------------------------------------
काश्मीरमधल्या अर्थकारणात पर्यटन हा महत्वाचा आर्थिक स्त्रोत आहे
पर्यटनातून होणारी वार्षिक उलाढाल १२,००० कोटी रु. आहे.
राज्याच्या एकूण जीडीपीत पर्यटनाचा वाटा ७ ते८ टक्के इतका आहे
२०२१ मध्ये काश्मीरमझ्ये १ कोटी १३ लाख पर्यटकांनी भेट दिली होती
पण २०२४ मध्ये काश्मिरात तब्बल अडीच कोटी पर्यटक पोहोचले
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे काश्मिर सुधरत होतं
दहशतवादामुळे विखुरले गेलेले काश्मिरी पुन्हा आपल्या राज्यात परतत होते
पण पहलगाम हल्ल्यानं काश्मीरच्या पर्यटनाचं काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय...
पहलगाम हल्ला...
त्यानंतर सीमावर्ती भागात
भारत आणि पाकिस्तानमधली युद्धजन्य स्थिती
यामुळे पर्यटकांची काश्मीरकडे वळणारी पावलं
दुसरीकडे वळली... आणि इथले व्यावसायिक हताश झाले....
आज जम्मू काश्मीरमधील प्रत्येक व्यावसायिक
पर्य़टक पुन्हा इथे परतावेत अशीच आस लावून आहेत...
पण पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा हेतू मात्र साध्य झालाय....
पीटीसी - प्रतिनिधी
((२०१९ मध्ये काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षात इथल्या अतिरेकी कारवायांना खीळ बसली होती. काश्मीरमधलं जनजीवन सुधरत होतं. आणि नेमकी हीच बाब काश्मीरवर वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या दहशतवाद्यांना खुपत होती.))
काश्मीर सुधरला...
भयमुक्त झाला...
तर इथे आपली डाळ शिजणार नाही
हे दहशतवादी जाणून होते... आणि म्हणूनच
कधीही पर्यटकांच्या केसालाही धक्का न लावणाऱ्या दहशतवाद्यांनी
यावेळी सर्वसामान्य पर्यटकांना टार्गेट केलं...
आणि काश्मीरला पुन्हा एकदा मागे ढकललं...
दहशतवाद्यांच्या या कृत्याला
ऑपरेशन सिंदूर राबवून भारतानं
जशास तसं उत्तर दिलं...
पण या सगळ्यामुळे काश्मीरमध्ये उद्धवलेल्या
आर्थिक संकटाचं काय?
सगळे कार्यक्रम




