एक्स्प्लोर
Swami Samarth: स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी असल्याचं कसं ओळखाल? फक्त 'हे' विचार आचरणात आणून बघा, आपोआप समस्या सुटतील..
Swami Samarth: व्यक्तीचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. हे विचार आचरणात आणल्याने आपोआप स्वामी पाठीशी असल्याचा साक्षात्कार होतो.

Swami Samarth thoughts Hindu Religion marathi news know that Swami Samarth is with you Just put these thoughts into practice problems will automatically resolve
1/9

जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा. जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात ,तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात -स्वामी समर्थांचे विचार
2/9

मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही’, दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की.-स्वामी समर्थांचे विचार
3/9

फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधी साठी प्रगती करतात,पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.-स्वामी समर्थांचे विचार
4/9

डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत,संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत ,राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील.-स्वामी समर्थांचे विचार
5/9

अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही, ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेले आहे.-स्वामी समर्थांचे विचार
6/9

मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असाव. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. -स्वामी समर्थांचे विचार
7/9

कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे,तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही.-स्वामी समर्थांचे विचार
8/9

मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अध:पतन निश्चित आहे !-स्वामी समर्थांचे विचार
9/9

जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही , भीती वाटत नाही तेव्हा समजावे आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरदहस्त लाभला कि मग आपण आपले राहातच नाही . त्यांचे बोट धरले आहे मग आता ते नेतील तिथे आणि करतील ते ह्या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते
Published at : 25 May 2025 12:56 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
कोल्हापूर
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion