India China: पाकड्यांनंतर चीनची नको ती चालाखी! अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावे बदलली; भारतानं ही खडसावलं

India China: चीनने पुन्हा एकदा भारताविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला आहे. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. यावर भारताने प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement

India China: चीनने पुन्हा एकदा भारताविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. या मुद्द्यावर भारताने चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे.भारताने बुधवारी चीनच्या प्रयत्नांना स्पष्टपणे नकार दिला आणि म्हटले की अशा हास्यास्पद प्रयत्नांनी हे वास्तव बदलणार नाही.

Continues below advertisement

अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावर भारताने चीनला कडक संदेश दिला आणि म्हटले की, "सत्य बदलणार नाही." हे राज्य भारताचा अविभाज्य भाग होते, आहे आणि राहील. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे चीनने जाहीर केल्यावर प्रतिक्रिया देताना भारताने ही यावर भाष्य केलं आहे. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा चीनचा दावा आहे.

अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग - परराष्ट्र मंत्रालय

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "आम्हाला असे आढळून आले आहे की चीनने भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील ठिकाणांची नावे बदलण्याचे व्यर्थ आणि हास्यास्पद प्रयत्न केले आहेत." ते म्हणाले, "आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार आम्ही अशा प्रयत्नांना स्पष्टपणे नकार देतो." या मुद्द्यावर माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना जयस्वाल यांनी ही टिप्पणी केली. ते म्हणाले, "क्रिएटिव्ह नामकरणामुळे अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य आणि अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील हे निर्विवाद वास्तव बदलणार नाही."

भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात चीनचे नापाक कृत्य

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर सीमेवर तणाव खूप वाढला आहे. पाकिस्तानने देशातील अनेक ठिकाणी हल्ला करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. आता दुसरीकडे, चीन आपल्या कारवायांपासून मागे हटत नाहीये. त्याने यापूर्वीही अरुणाचल प्रदेशकडे वाईट नजरेने पाहिले होते.

मोठी बातमी! चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या एक्स-हँडलवर भारतात बंदी

चीनमधील ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राच्या एक्स-अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. ग्लोबल टाईम्सवर भारताविरुद्ध खोट्या बातम्या चालवल्याचा आरोप आहे. या कारणास्तव, त्याच्या एक्स हँडलवर बंदी घालण्यात आली आहे.

जेएफ-17 पडल्याचं पाकिस्ताने कबुल केलं

भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत सातत्याने खोटी माहिती, जगभरात पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्ताने त्यांचं चीनी बनावटीचं जेएफ-17 लढाऊ विमान भारताने पाडल्याच्या दाव्याला पुष्टी दिली आहे. पाकिस्तानने जाहीर केलेल्या 11 मृत सैनिकांच्या यादीत, स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफ यांचाही समावेश आहे. जकोबाबाद विमानतळावरून उस्मान युसूफ आणि त्याचे सहकारी, जेएफ-17विमानाने हवेत उड्डाण करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला चढवला त्यात ते मृत्यूमुखी पडले. भारतीय हवाई दलाच्या या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या लष्करी तळावरील यंत्रणेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

इतर महत्वाच्या बातम्या 

India Pakistan: चुकून पाकिस्तानात गेलेला BSF जवान भारतात परतला, 20 दिवसांनी पाकने सोडलं, अटारी बॉर्डरवरुन पी के साहू परतले!

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »