Solapur News: मोठी बातमी: उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; पंढरपूर, मंगळवेढा अन् सांगोल्यासाठी खुशखबर
Solapur News: सोलापूर महापालिकेसह पंढरपूर मंगळवेढा या नगरपालिकांना उजनी धरणातून सहा हजार क्यूसेक्सने पाणी देण्यास सुरुवात. 18 एप्रिल रोजी उजनी धरण जाणार वजा पातळीत

सोलापूर: गेल्यावर्षी पावसाळ्यात उजनी धरण 100% भरूनही जिल्ह्यातील पाण्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनू लागली आहे. आज सोलापूर महापालिकेसह पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या नगरपालिकांसाठी उजनी धरणातून (Ujani Dam) सहा हजार क्युसेक निसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने दिला आहे. सध्या सोलापूर (Solapur Crime) शहरासह सर्वच नगरपालिकांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात त्यांचाही असल्याने भीमा नदीत हे पाणी सोडण्यात आलेले आहे.
यासोबत गेल्या काही दिवसापासून उजनी कालवा, सीना माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना, बोगदा यामध्ये जवळपास 4400 क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडले जात आहे. भीमा नदीत सोडलेले हे पाणी सोलापूर शहरापर्यंत पोहोचायला बारा ते तेरा दिवस लागणार असून रोज दोन टक्के म्हणजेच एक टीएमसी पाणीसाठा धरणातून कमी होत जाणार आहे.
सध्या उजनी धरणात 72.90 टीएमसी एवढा पाणीसाठा असून जिवंत पातळीत केवळ 9.24 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. रोज एक टीएमसी या पद्धतीने पाणी कमी होत राहिल्याने साधारण 18 एप्रिल रोजी धरण वजा पातळीत जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षीची परिस्थिती चांगली असून गेल्या वर्षी 21 जानेवारी 2023 रोजीच धरण वजा पातळीत गेले होते. यावर्षी मात्र साधारण 18 एप्रिल 2025 रोजी उजनी धरण वजा पातळीत जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाबी एवढीच असून सध्या सोडलेले कालव्यातील पाणी हे 15 मे पर्यंत अखंड सुरू राहणार असल्याने शेतातील पिके जगण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
सोलापूर शहरासाठी वास्तविक चार टीएमसी एवढ्या पाण्याची गरज असताना पाईपलाईनचे काम पूर्ण नसल्याने उजनी धरणातून नदीद्वारे जवळपास 24 टीएमसी म्हणजे सहा पट पाणी जास्त सोडावे लागत आहे. त्यामुळे सिंचनाच्या पाण्याला अडचणी नेहमीच निर्माण होत असतात. सध्या सोलापूर शहरासाठीच्या दुसऱ्या पाईपलाईनचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने पुढील वर्षीपासून उजनी धरणावर सोलापूर महापालिकेचा बोजा राहणार नाही.
धाराशिवमध्ये पाणीटंचाई
धाराशिव शहराला उजनी जलाशयातून पाणीपुरवठा होतो. उजनी धरणातलं पाणी तेरणा जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचत. तिथून शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. नगरपरिषदेकडून शहरात पाच ते सहा दिवसाला पाणीपुरवठा केला जात असल्याचं सांगितल जात आहे. मात्र धाराशिवकरांचं म्हणणं वेगळं आहे. पाणीटंचाईचा सामना त्यांना करावा लागतोय. आठ आठ दिवस पाणी येत नाही, आले तरी ते खूप कमी वेळ पाणी येतं, पाण्याचा दाबही कमी आहे. मग आम्ही उन्हाळ्यात पाण्याची गरज कशी भागवायची असा सवाल महिला करत आहेत.
आणखी वाचा
प्रकल्पात पाणी असूनही औसेकरांचा घसा कोरडा, नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळं पाणीटंचाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
