Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर शिंदे गटात जाताच काँग्रेस नेत्याने खदखद बोलून दाखवली, म्हणाले, टेंडरमध्ये प्रॉब्लेम आल्याने...

Arvind Shinde on Ravindra Dhangekar : वक्फ बोर्डच्या जागेचा वाद होता. वक्फ बोर्डचा विषय होता, त्यात त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून पक्ष सोडला, असंही अरविंद शिंदे यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

पुणे: पुण्यात काँग्रेस पक्षाला शिवसेना शिंदे गटाने खिंडार पाडलं आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्षाची साथ सोडत काल शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धंगेकरांबाबतची खदखद बोलून दाखवली आहे. अरविंद शिंदे धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर बोलताना म्हणाले, ज्याची विचारधारा शुन्य त्यावर बोलणार नाही. पक्ष कुठच कमी पडला नाही. पक्षाने त्यांना चारवेळा संधी दिली तरी पक्षाला सोडून गेले. मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता. पक्षाने 3 वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून 4 वेळा संधी दिली. ज्यादिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही. खालच्या थराला जाऊन राजकारण करणाऱ्या लोकांविषयी बोलणार नाही. त्यांच्या व्यक्तीगत दुष्कारणांसाठी गेले. काँग्रेस पक्षाने मान दिला, पक्षाच्या कुठल्याच आंदोलनाला ते आले नाही. आता यांना मतदारांनी नाकारलं आहे. त्यांना लीड घेता आलं नाही,असंही अरविंद शिंदे यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

पक्षाने माझ्यासाठी काम करावं मी पक्षासाठी काम करणार नाही अशी भूमिका ते घेत होते. यापुढे पक्षाला विनंती आहे, अशा लोकांना पक्षात घेऊ नये, यांचा इतिहास असाच आहे. विचारधारा एक नाही काहीच नाही. हे संधीसाधूपणा करत आहेत, आम्ही पक्षाला सांगितलं होतं. अनेकदा पक्षाच्या विरोधात काम करत आहेत, असे सांगितलं होतं. आम्ही कधीच त्यांच्यावर बोललो नाही. रस्त्यावर आम्ही उतरून काम केलं. देश राम मंदिर उत्सव साजरा करताना हे बाबरी मशीदवर बोलत होते, विचारधारा नाही. यांना एका पार्टीची लाइन धरता येत नाही. कुठल्याच बैठकीला, आंदोलनांना येत नाहीत, अशी तक्रार अनेकदा आम्ही पक्षाला दिली होती. त्यांना अनेकदा समज दिली, मात्र बदल झाला नाही. हे स्वतःला स्वयंघोषित नेते समजतात, यांनी काय केलं नाही. एक नगरसेवक केला नाही, आम्हाला दुःख आहे की,अशा नाकर्त्यांवर आम्ही विश्वास ठेवला, यांनी केवळ मतलबी राजकारण केलं, असंही अरविंद शिंदे यांनी म्हटलं आहे.

टेंडरमध्ये प्रॉब्लेम म्हणून पक्ष सोडला 

पुढे बोलताना अरविंद शिंदे म्हणाले, त्यांच्या टेंडरमध्ये प्रॉब्लेम म्हणून पक्ष सोडला. वक्फ बोर्डच्या जागेचा वाद होता. वक्फ बोर्डचा विषय होता, त्यात त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून पक्ष सोडला. त्यांच्या बायकोचा विषय नाही, वहिनींचं नाव कुठ नाही. स्वतःच्या फायद्यासाठी यांनी राजकारण केलं. त्यांच्यामुळे पक्षाला फायदा कधीच झाला नाही. यांच्यात हिम्मत असती तर समोर येऊन पत्र देऊन पक्ष सोडून गेले असते. तीन नगरसेवक असताना त्या पक्षातील लोकांनी अनेक विषय बाहेर काढले, आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना हरवू त्यांना कायमचं माजी ठेवू. ससूनमधले विषय, ड्रॅग्सचे विषय पुढे का गेले नाहीत, स्वतःच्या फायद्यासाठी आंदोलन केली. पुढं या आंदोलनाचं काय झालं. आता पक्ष सोडणाऱ्या लोकांना विनंती आहे की, समोर येऊन सांगून मर्दासारखं जावा. कुठलीही गटबाजी नाही. आम्ही काही बंधन आणि संस्कार पळतो. काहीही बोलू नका, नाहीतर योग्य उत्तर देऊ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »