CDS Anil Chauhan : जेव्हा कसोटी मॅच डावानं जिंकतो त्यावेळी विकेट किती गेल्या महत्त्वाचं नसतं : सीडीएस अनिल चौहान
CDS Anil Chauhan : सीडीएस अनिल चौहान यांनी पुण्यात बोलताना म्हटलं की नुकसान किती झालं हे महत्त्वाचं नसतं. निकाल काय लागला आणि आपला प्रतिसाद काय होता, हे महत्त्वाचं होतं.

CDS Anil Chauhan पुणे : सीडीएस अनिल चौहान यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि स्ट्रॅटेजिक अभ्यास या विभागातर्फे आयोजित फ्यूचर वॉर्स अँड वॉरफेअर या विषयावर मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी आपलं काय नुकसान झालं हे महत्वाचं नाही,आपण काय प्रतिकार केला हे महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. सीडीएस अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूर वेळी भारताचं किती नुकसान यासंदर्भात विचारलं जातं, त्यासंदर्भात एक उदाहरण देताना ते म्हणाले की ते महत्त्वाचं नाही. निकाल महत्त्वाचा असून तुम्ही कसा प्रतिसाद देता हे महत्त्वाचं आहे. यासाठी त्यांनी कसोटी मॅचचं उदाहरण दिलं.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी आपण भविष्याचा विचार करतो त्यावेळी भूतकाळाकडे पाहावे लागते. भूतकाळाकडून आपण काही शिकत असतो आणि तो पुढे आपल्याला मदत करतो, असं म्हटलं.कोणत्याही युद्धात दोन घटक असतात, हिंसा आणि हिंसेमागील राजकारण होय. राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी हिंसेचा वापर केला जातो. युद्धात चार घटक महत्वाचे असतात. युद्ध लढणारे , ग्राउंड काम करणारे , तंत्रज्ञान , लोकांच्या इमोशन महत्वाच्या असतात त्या खूप मदत करतात, असं अनिल चौहान म्हणाले.
इमोशन, चान्स आणि कारण या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात.या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑपरेशन सिंदुरमध्ये पाहायला मिळाल्या. पहलगाम मध्ये झालेला हल्ला आपण पहिला. पहलगाममध्ये क्रूरपणा दिसून आला, धर्माच्या नावावर लोकांना मारलं गेलं. भारत हा कायम दहशत वादाच्या विरोधात आहे. लोकांची भावना होती की बदला घ्या आणि न्याय द्या, असं अनिल चौहान म्हणाले.
पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या पाहिजेत पण ते त्या थांबवत नाहीत. ते सतत अणू बॉम्बची धमकी देत असतात, असं अनिल चौहान म्हणाले. मिलिटरी ऑपरेशन या अविश्वसनीय असतात. प्रत्येक ऑपरेशन मध्ये रिस्क असते आपली क्षमता याचा विचार करावा लागतो. भारताची क्षमता आता वाढली आहे, असं अनिल चौहान यांनी सांगितलं. कोणताही देश आपल्या जुन्या क्षमतांचा अभ्यास करुन त्यामध्ये वाढ करत असतो. आपण उरी सर्जिकेल स्ट्राइक केला ही आपल्या हवाई दलाची क्षमता आहे, असं अनिल चौहान यांनी सांगितलं. आपल्याकडे न्यू ड्रोन सिस्टम आहे ,असंही ते म्हणाले.
युद्ध ही सतत चालणारी प्रक्रिया असते.1965 ला भुट्टोने सांगितलं होत 1 हजार वर्ष भारतासोबत युद्ध सुरू राहील. अलीकडे त्यांचे जनरल असीम मुनीर यांनी पहलगाम बाबत वक्तव्य केलं. मात्र, आपले दहशत वाद विरोधातले लढा सुरू राहील, असंही अनिल चौहान म्हणाले. पाकिस्तानला त्यांच जास्त नुकसान करून घ्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी टेलिफोनवरून आपल्याशी बोलणं केलं. अवघ्या 8 मिनिटात आपण त्यांचे दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. रात्री 1 वाजून30 मिनिटानी आपण हल्ला केला. युद्धासाठी 5 गोष्टी महत्वाच्या असतात, असंही ते म्हणाले. कॉर्पोरेशन, कॉम्पिटिशन, कन्फ्रटेशन,कॉन्फ्लिक्ट आणि कॉम्बॅट याचा समावेश असतो, असं सीडीएस चौहान म्हणाले.
भविष्यात इनफार्मेशन वॉर वर काम केल पाहिजे. आपण पाकिस्तानवर हल्ला करत असताना अचूक हल्ला केला. युद्धासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलजी काय करत असतात. सेन्सर टेक्नॉलॉजी, सगळ्या ठिकाणी आपल्याला ते डिप्लॉय करावे लागेल. हायपरसॉनिक टेक्नलॉजी जे आपल्याकडे ब्राह्मोस आहे , छोटे ड्रोन , रडार यंत्रना सगळ्या गोष्टी यात आहेत.
रोबोटिक्स आणि ऑटोमेशन
आधी माणूस आणि माणसात युद्ध व्हायच आता मशीन आणि मशीनमध्ये होत आहे त्यासाठी टेक्नोलॉजी महत्वाची आहे. स्पेस ,साइबर यामध्ये भविष्यात महत्वाच्या आहेत
डेटा सेंट्रिक आणि रिमोट युद्ध होऊ शकतं, असं अनिल चौहान म्हणाले.
टॅक्टिक आणि स्ट्रेटेजी हा चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे. भविष्यातला युद्धाची स्थिती पाहता आपण आपल्यात बदल करतोय.आपलं काय नुकसान झालं हे महत्वाचं नाही. मात्र आपण काय प्रतिकार केला हे महत्वाचं आहे, असं अनिल चौहान म्हणाले.
सीडीएस अनिल चौहान यांनी फुटबॉलचं उदाहरण दिलं. आपण पाकिस्तानवर असा खोलवर हल्ला केला की त्यांना कळला नाही.सरगोडा, झुकूजाबाद, इथे हल्ला झाल्यावर त्यांना कळालं. पाकिस्तानला अजून नुकसान करून घ्यायचं नव्हत म्हणून त्यांनी कॉल केला, असं अनिल चौहान म्हणाले.भविष्यात युद्धात AI चा वापर होऊ शकतो, असंही ते म्हणाले.
डावानं जिंकतो त्यावेळी विकेट महत्त्वाच्या नसतात...
जेव्हा मला विचारलं जातं की आपलं किती नुकसान झालं, तेव्हा मी म्हणतो ते महत्त्वाचं नाही. निकाल महत्त्वाचा असून तुम्ही कसा प्रतिसाद देता हे महत्त्वाचं आहे. नुकसानासंदर्भात बोलणं योग्य होणार नाही. मात्र, जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये कसोटी मॅच खेळत असता आणि डावानं जिंकता त्यावेळी किती विकेट गेल्या, किती बॉल आणि किती फलंदाज बाद झाले हे महत्त्वाचं नसतं. तांत्रिक निकषांनुसार आम्ही यासंदर्भातील विशिष्ट डेटा तुमच्यासोबत शेअर करु, असं अनिल चौहान म्हणाले. आम्ही तुम्हाला सांगू शकतो आमी किती विमानं नष्ट केली, किती रडार नष्ट केले. आम्ही एक ढोबळ परीक्षण करत आहोत लवकरच माहिती देऊ, असं सीडीएस अनिल चौहान म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
