एक्स्प्लोर

मोठी बातमी : लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल : संजय शिरसाट

राज्यातील सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्याला पैसे कमी मिळत असल्याचा दावा केला.

मुंबई : राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना (Ladki bahin yojana) 1500 रुपयांत वाढ करुन 2100 रुपये देण्यात येतील, अशी घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती. मात्र, राज्यात महायुती (Mahayuti) सरकार येऊन 6 महिने होत आले, त्यातच एक अर्थसंकल्पीय अधिवेशनही पार पडलं. मात्र, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यातच, सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी 2100 रुपये देण्याचा शब्द दिलाच नव्हता असे म्हटले. तर, आता मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.  लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असे शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

राज्यातील सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्याला पैसे कमी मिळत असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या खात्याचा पैसा वळविण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरुन एकवाक्यता नसल्याचे दिसून येते. त्यातच, आज भूमिका मांडताना शिरसाट यांनी स्पष्टच शब्दात लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले. 

राज्याच बजेट अडीच लाख कोटी रुपयांच आहे. सामाजिक न्याय विभागाला साडे एकोणतीशे कोटी मिळायला हवेत. मला 22 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. लाडक्या बहिणींसाठी 3 हजार कोटी विविध योजनेसाठी 7 हजार कोटी दिले आहेत. मला केवळ 15 हजार कोटी रुपये मिळाले, त्यातील 7 हजार कोटी दुसऱ्या योजनेला गेले आहेत. त्यामुळे, मला 3 हजार कोटी रुपये देणे आहे. मुख्यमंत्र्यांना मी लेखी पत्र दिलं आहे, अजित पवार यांना देखील विनंती केली आहे. 11.8 टक्के रक्कम मला म्हणजेच माझ्या खात्याला देणं गरजेचे आहे, असे म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी आपली भूमिका परखडपणे मांडली.

1500 चे 2100 करता येणार नाही

लाडक्या बहीण बाबत मला फेब्रुवारी मधे फाईल आली होती त्यावेळी मी स्पष्टपणे पैसे देत येणार नाही अस लिहिलं होतं. लाडक्या बहीण योजनेचे सरकारवर बर्डन आहे. अजित पवार जाणीवपूर्वक करत असतील असं मला वाटत नाही. त्यांना गाईड करणारे सेक्रेटरी चुकीच ब्रीफ करत असणार, असे म्हणत संजय शिरसाट यांनी आपली नाराजी आणि लाडकी बहीण योजनेबद्दलची वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली. 1500 रुपयेची रक्कम 2100 करता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे ती मान्य करावी लागेल, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. 

मंत्रिमंडळ बैठकीत सगळे विषय निघणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने होत असलेल्या महाबळेश्वर महोत्सवास उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. यासंदर्भात शिरसाट यांनी भूमिका मांडली. एखाद्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री न जाण असं अनेकवेळा होतं असतं. अनेकवेळ कार्यक्रमाला वेळा दिल्या जातात, मात्र काहीवेळा जाता येत नाही. अजित पवार माझ्या मतदारसंघात आले मात्र मला माहितीच नाही. मला सांगणं अपेक्षित होतं मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले. तसेच, उद्या चौंडीला कैबिनेट बैठक होतं आहे या बैठकीमधे सगळे विषय निघणार आहेत. काम करताना फ्रिडम द्यायला हवं. मी माझी व्यथा मांडत आहे, मी पैसा काय घरी घेऊन जात नाही. मला खातं चालवायच आहे, खात चालवताना अडचणी येत आहेत त्या बोलण गरजेचं आहे, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

डॉ. वळसंगकर प्रकरणात नवा ट्विस्ट! डॉ. सोनाली वडिलांसह गायब? दोघेही बेपत्ता, परदेशात गेल्याची चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधक मोठा निर्णय
मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधक मोठा निर्णय
Bharat Gogawale vs Anand Paranjpe: राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
Mumbai Metro News: मोठी बातमी: घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प, तीन-चार तास वाहतूक बंद राहणार?
घाटकोपर-वर्सोवा मेट्रोची वाहतूक पूर्ववत, ओव्हरहेड वायवरील ताडपत्री हटवली, प्रवाशांना दिलासा
Pakistan Vs Israel Army: पाकिस्तान आणि इस्रायलचं युद्ध झालं तर कोण जिंकेल? दोन्ही देशांकडे कोणकोणती संहारक अस्त्रं?
पाकिस्तान आणि इस्रायलचं युद्ध झालं तर कोण जिंकेल? दोन्ही देशांकडे कोणकोणती संहारक अस्त्रं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC :नाकाने कांदे सोलणारे,तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे फिरताय?राऊतांचा हल्लाबोलNashik Varkari Ringan :नाशिकमध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळाKundmala Bridge Accident: सहा वर्षाचा भाचा गेला, बहीण रुग्णालयात, मामाचं दु:ख अनावरKundmala Bridge Collapsed: अडीच तास पाण्यात होतो,पूल कोसळल्यावर वैभवबरोबर काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधक मोठा निर्णय
मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधक मोठा निर्णय
Bharat Gogawale vs Anand Paranjpe: राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
Mumbai Metro News: मोठी बातमी: घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प, तीन-चार तास वाहतूक बंद राहणार?
घाटकोपर-वर्सोवा मेट्रोची वाहतूक पूर्ववत, ओव्हरहेड वायवरील ताडपत्री हटवली, प्रवाशांना दिलासा
Pakistan Vs Israel Army: पाकिस्तान आणि इस्रायलचं युद्ध झालं तर कोण जिंकेल? दोन्ही देशांकडे कोणकोणती संहारक अस्त्रं?
पाकिस्तान आणि इस्रायलचं युद्ध झालं तर कोण जिंकेल? दोन्ही देशांकडे कोणकोणती संहारक अस्त्रं?
विखे-पाटील नव्हे हे तर विकले गेलेले पाटील, सत्तेसाठी इतकी चाटूगिरी करू नये; 'ते' पुस्तक दाखवत राधाकृष्ण विखेंवर प्रहारचा जोरदार पलटवार
विखे-पाटील नव्हे हे तर विकले गेलेले पाटील, सत्तेसाठी इतकी चाटूगिरी करू नये; 'ते' पुस्तक दाखवत राधाकृष्ण विखेंवर प्रहारचा जोरदार पलटवार
मोठी बातमी: केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणेची अधिसूचना जारी; जाणून घ्या सर्वेक्षणाबाबत या 10 महत्त्वाच्या गोष्टी
मोठी बातमी: केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणेची अधिसूचना जारी; जाणून घ्या सर्वेक्षणाबाबत या 10 महत्त्वाच्या गोष्टी
Kolhapur Weather Update: कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी तासात दोन फुटांनी वाढली; करुळ घाटात दरड कोसळली, राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला
कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी तासात दोन फुटांनी वाढली; करुळ घाटात दरड कोसळली, राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला
करिष्मा कपूरचं लग्न अभिषेक बच्चनसोबत होणार होतं, कशामुळे मोडलेला साखरपुडा?
करिष्मा कपूरचं लग्न अभिषेक बच्चनसोबत होणार होतं, कशामुळे मोडलेला साखरपुडा?
Embed widget
OSZAR »