एक्स्प्लोर

PM Modi & Amit Thackeray: आपला विजय झालेला नाही, शस्त्रसंधी झालीय, भारतीय जवानांच्या प्राणत्यागानंतरचा जल्लोष मनाला वेदना देणारा; अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

India Pakistan War ceasefire: सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून ‘ceasefire’ (युद्धविराम) आहे.

मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आपण युद्धात विजय मिळवलेला नाही, तर हा केवळ युद्धविराम आहे. त्यामुळे देशभरात सुरु असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणार असल्याची खंत अमित ठाकरे यांनी पत्रात बोलून दाखवली आहे. अमित ठाकरे यांच्या या पत्रावर आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, हे बघावे लागेल. (India Pakistan War)

अमित ठाकरेंच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?

सस्नेह जय महाराष्ट्र,

आपल्या नेतृत्वाखाली देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांवर निर्णायक वाटचाल केली आहे. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण घेतलेले कठोर पण आवश्यक निर्णय देशहितासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत, याबद्दल आपले आभार. सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचं लक्ष पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याकडे केंद्रित झालं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. भारतीय लष्कराने आपल्या शौर्याने संपूर्ण देशाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं आहे.

आज देशात प्रत्येक घरातून, चौकात, सोशल मीडियावरून सैनिकांच्या कार्याला सलाम केला जात आहे. सैन्याच्या प्रत्येक हालचालीकडे आज देश प्रेमाने आणि गर्वाने पाहत आहे. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळेच आपण सुरक्षित आहोत आणि म्हणूनच त्यांचे कार्य कुठल्याही सन्मानापेक्षा मोठे आहे.

या पार्श्वभूमीवर, सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून ‘ceasefire’ (युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत.

या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल, तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा ‘विजय यात्रा’ (मुख्यत्वे राजकीय स्वरूपातील) या समर्पक वाटत नाहीत. वास्तविक, या क्षणी देशवासीयांच्या मनात एकच भावना आहे, शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे, आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे.

त्यासोबतच, सध्याच्या घटनाक्रमाचा विचार करता, देशात काही गंभीर बाबींविषयी अजूनही अनिश्चितता आहे. उदाहरणार्थ, पहलगाममध्ये घडलेला क्रूर दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये 26 निरपराध पर्यटकांनी आपला जीव गमावला, हा अजूनही जनतेच्या मनात जिवंत आहे. त्या निर्दयी अतिरेक्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई होणे हीच खरी जनभावना आहे. याशिवाय, भारत-पाकिस्तान सीमारेषेवर गेल्या काही दिवसांत आपल्या काही नागरिकांनी आणि जवानांनी आपले अमूल्य प्राण गमावले आहेत. अशा पार्श्वभूमीवर विजयाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा, समाजात या संदर्भातील साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं हे अधिक योग्य ठरेल.

तसेच, जरी सध्या युद्धविराम जाहीर झाला असला, तरी पाकिस्तानच्या गतइतिहासाचा विचार करता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशाच संधींमध्ये दगाफटका केलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत समाजातील नागरिकांना सजग ठेवणे, युद्धजन्य परिस्थितीत त्यांना काय करावे याचे मार्गदर्शन करणे, आणि त्यांची मानसिक तयारी घडवून आणणे हेही सरकारच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरायला हवा.

मा. मोदीजी, आपल्याकडून आजही देशवासियांना हा विश्वास आहे की, आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात. आणि म्हणूनच, या पत्राद्वारे एक मनापासूनची विनंती करतो की, युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा.

आपल्या निर्णयक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि आपल्याकडून या भावनांची योग्य दखल घेतली जाईल, हीच अपेक्षा.

आपला नम्र,
अमित राज ठाकरे
(नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

आणखी वाचा

ऑपरेशन सिंदूर नंतर कौतुक सोडाच पण राज ठाकरेंनी मोदींच्या कारभाराचे वाभाडे काढले, म्हणाले, युद्ध अन् एअर स्ट्राईक उत्तर नव्हे

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer News : लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
Sambhajiraje Chhatrapati : दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Shashi Tharoor : काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत  शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी पैसा खाल्ला, बावनकुळेंचा गंभीर आरोपAnand Paranjape Full PC : संपूर्ण महाराष्ट्राची भाषा मराठीच, मनसेनंतर राष्ट्रवादी देखील आक्रमकPratap Sarnaik : सुनांना सांगितलंय, नातवांशी मराठीतच बोलायचं; सरनाईकांकडून सारवासारव ABP MAJHASpecial Report Kashmir Tourism | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पर्यटन पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer News : लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!
Sambhajiraje Chhatrapati : दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Shashi Tharoor : काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत  शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
काँग्रेस नेत्यांकडून टीका, ब्राझीलमध्ये प्रश्नाचं उत्तर देत शशी थरुर म्हणाले,'आता वेळ आलीय की...'
Ukraine Russia War : दीड वर्ष नियोजन, ट्रकमधून ड्रोन पाठवले, एक बटन दाबताचं 40 विमानांचं नुकसान,यूक्रेनकडून थोड्या खर्चात रशियाचं अब्जावधीचं नुकसान 
दीड वर्ष नियोजन, ट्रकमधून ड्रोन पाठवले, यूक्रेननं एक बटन दाबताचं रशियाच्या 40 विमानांचं नुकसान
अजित पवारांना आता पंख फुटलेत, वाटी-ताटीत नव्हे तर ते समुद्रात तोडपाणी करतात; लक्ष्मण हाकेंचा थेट दादांवर हल्ला
अजित पवारांना आता पंख फुटलेत, वाटी-ताटीत नव्हे तर ते समुद्रात तोडपाणी करतात; लक्ष्मण हाकेंचा थेट दादांवर हल्ला
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा पुण्यात एकत्र येणार, नेमकं कारण काय? 
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा पुण्यात एकत्र येणार, नेमकं कारण काय? 
अंबाजोगाईत सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेत भामट्याने घातला 83 लाखांचा गंडा
अंबाजोगाईत सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, IPS विश्वास नांगरे पाटलांचे नाव घेत भामट्याने घातला 83 लाखांचा गंडा
Embed widget
OSZAR »