एक्स्प्लोर

Deepak Kesarkar: शिवसैनिकांनो डोळे उघडा, आदित्य ठाकरे-रश्मी ठाकरे दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटून आलेत; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics: शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे गट आणि भाजप एकत्र येणार? आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याची माहिती.

मुंबई: आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले आहेत, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर ((Deepak Kesarkar)  यांनी केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दोनवेळा दिलेला शब्द फिरवला आहे. त्यामुळे आता त्यांना जवळ करायचे की नाही, हे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी स्वत:च ठरवावे. पण यानिमित्ताने ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा भाजपसोबत येण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे, असे केसरकर यांनी म्हटले. त्यांनी मंगळवारी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना याबाबत भाष्य केले. काही वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे केसरकर यांनी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचे म्हटले आहे. 

दीपक केसरकरांनी नेमका काय दावा केला?

रश्मी ठाकरे आणि अमृता फडणवीस यांनी जामनगरला जाताना एकाच विमानाने प्रवास करणे, हा निव्वळ योगायोग होता. त्यामध्ये फार काही विशेष नाही. महत्त्वाची बातमी ही आहे की, शिवसेनेतील ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपसोबत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांनुसार, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या बातम्यांचा इन्कार केलेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी विचारलेला प्रश्न योग्य आहे. तुम्ही (ठाकरे गट) पुन्हा भाजपसोबत जाणार नाही, याची गॅरंटी काय? हा प्रश्न योग्य आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. शिवसैनिकांनी आतातरी डोळे उघडले पाहिजेत. महायुती होणार होती. उद्धव ठाकरे दिल्लीत तसं ठरवूनही आले होते. पण त्यांनी शब्द फिरवला. दोनवेळा शब्द फिरवल्यानंतर त्यांना आता जवळ येऊ द्यायचे की नाही, हा निर्णय आता पंतप्रधान मोदींनीच घ्यावा, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

ठाकरे कुटुंब-अमृता फडणवीसांचा एकत्र विमानप्रवास

अंबानी परिवाराने नुकत्याच जामनगर येथे आयोजित केलेल्या जंगी सोहळ्याला अनेक राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. ठाकरे कुटुंबीय आणि देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस हे सोहळ्याला आले होते. विशेष म्हणजे या सोहळ्याला जाताना या सगळ्यांनी एकाच विमानाने प्रवास केला. 29 फेब्रुवारीला संध्याकाळी 7.30 वाजता अमृता फडणवीस जामनगरला निघाल्या होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांच्याकडे जास्त सामान होते. अमृता फडणवीस यांच्यासाठी जे विमान होतं, त्यामध्ये हे सर्व सामान मावणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना दुसऱ्या विमानाने प्रवास करावा लागणार होता.हे दुसरं विमान ठाकरे कुटुंबियांचं होतं. यानंतर अमृता फडणवीस यांनी एव्हिएशनला विनंती करुन दुसऱ्या विमानाची मागणी केली. एव्हिएशनने ठाकरे कुटुंबाची परवानगी घेतली, ठाकरे कुटुंबाने कोणताही नकार दिला नाही. यावेळी विमानात ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे होते. 

आणखी वाचा

गुंडांच्या देशा, लाचार देशा, गद्दारांच्या देशा अशी महाराष्ट्राची ओळख बनलीये : उद्धव ठाकरे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तिलारी खोऱ्यात आढळला दुर्मिळ प्रजातीचा साप; व्हायपरसारखा नाकाड्या-चापडा
तिलारी खोऱ्यात आढळला दुर्मिळ प्रजातीचा साप; व्हायपरसारखा नाकाड्या-चापडा
मोठी बातमी! लड्डा दरोडा प्रकरणात एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक,घरातच सापडले 22 तोळे सोनं अन् काडतुसं
मोठी बातमी! लड्डा दरोडा प्रकरणात एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक,घरातच सापडले 22 तोळे सोनं अन् काडतुसं
Beed Walmik Karad: वाल्मिक कराडच्या वकिलांनी मकोका हटवण्यासाठी कायद्याचा कीस पाडला, उज्ज्वल निकमांनी 50 मिनिटांत सगळं खोडून काढलं, कोर्टात काय-काय घडलं?
वाल्मिक कराडच्या वकिलांनी मकोका हटवण्यासाठी कायद्याचा कीस पाडला, उज्ज्वल निकमांनी 50 मिनिटांत सगळं खोडून काढलं, कोर्टात काय-काय घडलं?
Rahul Gandhi : वायनाडमध्ये मतदार वाढले तर 'लोकशाही', नागपुरात वाढले तर 'चोरी' कशी? राहुल गांधींच्या गंभीर आरोपांवर भाजपकडून आकडेवारीसह प्रत्युत्तर
वायनाडमध्ये मतदार वाढले तर 'लोकशाही', नागपुरात वाढले तर 'चोरी' कशी? राहुल गांधींच्या गंभीर आरोपांवर भाजपकडून आकडेवारीसह प्रत्युत्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Robbery :  लड्डांच्या घरी दरोडाप्रकरणी रोहिणीला अटक, 22 तोळे सोनं ,7 जिवंत काडतुसं जप्त
ABP Majha Headlines : 06 PM : 24 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Marathi Literature Conference : पहिलीपासून इंग्रजी शिकवणे अन्यायकारक - डॉ. तारा भवाळकर
Deepak Pawar : त्रिभाषा सूत्र पाचवी नंतरच योग्य? दीपक पवार नेमकं काय म्हणाले...ABP MAJHA
ABP Majha Headlines : 05 PM : 24 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिलारी खोऱ्यात आढळला दुर्मिळ प्रजातीचा साप; व्हायपरसारखा नाकाड्या-चापडा
तिलारी खोऱ्यात आढळला दुर्मिळ प्रजातीचा साप; व्हायपरसारखा नाकाड्या-चापडा
मोठी बातमी! लड्डा दरोडा प्रकरणात एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक,घरातच सापडले 22 तोळे सोनं अन् काडतुसं
मोठी बातमी! लड्डा दरोडा प्रकरणात एन्काऊंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक,घरातच सापडले 22 तोळे सोनं अन् काडतुसं
Beed Walmik Karad: वाल्मिक कराडच्या वकिलांनी मकोका हटवण्यासाठी कायद्याचा कीस पाडला, उज्ज्वल निकमांनी 50 मिनिटांत सगळं खोडून काढलं, कोर्टात काय-काय घडलं?
वाल्मिक कराडच्या वकिलांनी मकोका हटवण्यासाठी कायद्याचा कीस पाडला, उज्ज्वल निकमांनी 50 मिनिटांत सगळं खोडून काढलं, कोर्टात काय-काय घडलं?
Rahul Gandhi : वायनाडमध्ये मतदार वाढले तर 'लोकशाही', नागपुरात वाढले तर 'चोरी' कशी? राहुल गांधींच्या गंभीर आरोपांवर भाजपकडून आकडेवारीसह प्रत्युत्तर
वायनाडमध्ये मतदार वाढले तर 'लोकशाही', नागपुरात वाढले तर 'चोरी' कशी? राहुल गांधींच्या गंभीर आरोपांवर भाजपकडून आकडेवारीसह प्रत्युत्तर
Railways: 1 जुलैपासून रेल्वे प्रवास महागण्याची शक्यता, रेल्वे AC आणि नॉन AC तिकीट दर वाढवण्याच्या तयारीत 
आता रेल्वे प्रवास महागणार, भारतीय रेल्वे 1 जुलैपासून AC आणि नॉन AC तिकीट दर वाढवण्याच्या तयारीत 
माळेगाव कारखाना निवडणुकीत तावरेंना पहिलं यश; महिला गटातून अजित पवारांना 'दे धक्का'
माळेगाव कारखाना निवडणुकीत तावरेंना पहिलं यश; महिला गटातून अजित पवारांना 'दे धक्का'
Shaktipeeth :  रत्नागिरी नागपूर महामार्ग असताना अन् कुणाची मागणी नसताना शक्तीपीठचा हट्टा का? सतेज पाटील यांचा सवाल 
शक्तीपीठचा हट्टा का? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांवर दडपशाही, आंदोलनाची भूमिका तीव्र करणार : सतेज पाटील
शक्तिपीठ महामार्गास 2 मंत्र्यांचा विरोध, मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद; राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनो दगडं तयार ठेवा
शक्तिपीठ महामार्गास 2 मंत्र्यांचा विरोध, मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद; राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनो दगडं तयार ठेवा
Embed widget
OSZAR »