Navi Mumbai Crime: नवी मुंबईच्या ऐरोलीत आयटी कंपनीतील तरुणीने आयुष्य संपवलं, घरात चिठ्ठी सापडली

नंदिनी ही येथे एका पेईंग गेस्ट रूममध्ये राहत होती. तिच्यासोबत आणखी तीन तरुणीही राहत होत्या, मात्र सुट्ट्यांमुळे त्या आपापल्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी नंदिनी एकटीच घरात होती.

Continues below advertisement

Navi Mumbai Crime: नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये एका खाजगी आयटी कंपनीत काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नंदिनी असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून ती मूळची उत्तर प्रदेशमधील कानपूरची रहिवासी होती. ही घटना ऐरोली सेक्टर 1 येथील ओंकार हाईट्स सोसायटीमध्ये घडली. नंदिनी ही येथे एका पेईंग गेस्ट रूममध्ये राहत होती. तिच्यासोबत आणखी तीन तरुणीही राहत होत्या, मात्र सुट्ट्यांमुळे त्या आपापल्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी नंदिनी एकटीच घरात होती.

Continues below advertisement

नेमकं घडलं काय?

घरात एकटी असताना नंदिनीने नैराश्यातून कपड्याच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. घरामधून कोणताही आवाज न आल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. दरवाजा उघडून पाहिल्यानंतर तिचा मृतदेह फॅनला लटकलेला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी घटनास्थळी तपास करताना नंदिनीच्या खोलीतून एक चिठ्ठीही जप्त केली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिने आर्थिक अडचणी, घरून येणारा मानसिक तणाव यामुळेच हे पाऊल उचलल्याचा उल्लेख केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. नंदिनी एका खाजगी आयटी कंपनीमध्ये कार्यरत होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ती सतत नैराश्यात दिसत होती, अशी माहिती तिच्या रूममेट्सनी दिली. सध्या रबाळे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील हिंजवडीमध्येही आयटी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनेही जगण्याची इच्छा संपल्याचं सांगत इमारतीवरून उडी मारत आयुष्य संपवल्याची घटना ताजी असताना नवी मुंबईतील घडलेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

सॉरी! माझी जगायची इच्छा संपली...तरुणीची आत्महत्या

सॉरी! माझी जगायची इच्छा संपली असे म्हणत हिंजवडीमध्ये IT इंजिनिअरने तरूणीने आयुष्य संपवले. 25 वर्षीय तरूणीने पहाटे 21व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. 31 मे रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव अभिलाषा असं आहे. नैराश्यातून अभिलाषाने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे 4 :30 सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली. त्यानंतर तिने लिफ्टने 21 व्या मजल्यावर आपल्या घरी जात पहाटे 4. 42 सुमारास आत्महत्या केली . अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात शरीरावरील महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याच नमूद करण्यात आलं आहे.

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »