Nagpur Accident News : भीषण अपघात! भरधाव वाहनानं तीन पलट्या खालल्या; पत्नीनं घटनास्थळीचं सोडले प्राण, तीन जण गंभीर

Nagpur Accident News : नागपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची एक बातमी समोर आली आहे. यात  नागपूर येथून भंडाऱ्याच्या दिशेनं येणाऱ्या एका भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यावरील डिव्हायडरवर धडकली.

Continues below advertisement

Nagpur Accident News : नागपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची एक बातमी समोर आली आहे. यात  नागपूर येथून भंडाऱ्याच्या दिशेनं येणाऱ्या एका भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यावरील डिव्हायडरवर धडकली (Accident News). या भीषण अपघातात वाहनानं तीन पलट्या खाल्ल्यात. या अपघातात पत्नीचा घटनास्थळीचं मृत्यू तर पती, मुलगी आणि मेहुणा असे तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूरच्या कुही - मांढळ फाट्यावर मध्यरात्री घडली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथील कृष्णा शेंडे हे पत्नी नीलम (२७), मुलगी देवांशी (४) आणि मेहुना हेमंत साऊस्कार हे चौघे नागपूरवरून भंडाऱ्याकडं येत असताना ही घटना घडली. यात नीलमचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून तिघांवर नागपूर इथं उपचार सुरू आहे.

Continues below advertisement

मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बस आणि टिप्परचा भीषण अपघात

दरम्यान, अशीच एक भीषण आपघातची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा-खामगाव दरम्यान मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळाची बस व टिप्पर समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला आहे. अपघातात टिप्परमधील तीन मजुराचा मृत्यू झाला आहे. तर मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसमधील 24 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

तीन मजुराचा मृत्यू, 24 प्रवासी जखमी 

जखमी प्रवाशांमधील सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर सर्व जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहे. मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस अकोल्याहून इंदोरकडे जात असताना खामगाव नांदुरा दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परला धडकून हा भीषण अपघात झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचविताना आई आणि मावशीचाही बुडून मृत्यू 

खेळताना पाण्यात पडून बुडण्याच्या मार्गावर असलेल्या मुलाला वाचविताना त्याची आई आणि मावशी या दोघींचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात अनजाले गावालगतच्या तापी नदी पात्रात घडली आहे. नकुल सतीश भील, वैशाली भील, सपना सोनवणे अशी या तिघा मृतांचे नाव आहे. अनजाले गावातील बादल लहू भील यांच्या कडे काल जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आटोपल्या नंतर वैशाली भील आणि सपना सोनवणे या तापी नदी पात्रात पाच वर्षीय नकुलसह कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. 

यावेळी नकुल पाण्यात खेळत असताना, तो पाण्यात बुडत असल्याचं लक्षात येताच वैशाली आणि सपना या त्याला वाचविण्यासाठी पाण्यात गेल्या. मात्र वाहत्या पाण्यात त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाच वर्षाच्या मुलासह दोघीही पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »