Murud-Janjira Fort: मुरुड-जंजिऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न; लाईफ जॅकेट नाही, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, अपघाताला आमंत्रण
Murud-Janjira Fort: पर्यटकांचा जीव धोक्यात घालून बेकायदेशीर पद्धतीने बोटी चालवल्या जात आहेत.

बोटीतून उतरवण्यासाठी पर्यटकांना अर्धा तास ते पाऊण तास प्रचंड उन्हात थांबवले जाते. लहान मुले, महिला, वयोवृद्ध यांना यामुळे त्रास सहन करावा लागतो. गडावर पोहोचल्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही शासकीय कर्मचारी दिसत नाही. पिण्याचे पाणी, सावली, आपत्कालीन सुविधा यांचा तुटवडाही कायम आहे. सुट्ट्यांमध्ये अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत असताना देखील प्रशासनाने कोणताही ठोस उपाययोजना केली नाही. नागरिकांच्या सुरक्षेचा खेळखंडोबा होत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष धक्कादायक आहे. यामुळे नागरिकांत संताप वाढला असून, गडावर जाणाऱ्या प्रत्येक बोटीत लाईफ जॅकेट सक्तीचे करावे, क्षमतेनुसारच प्रवासी घ्यावेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने शासकीय कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी आता होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

