Santosh Deshmukh Murder Case : अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
अजित पवार यांच्या भोवती असलेले कोंडाळे योग्य सल्ला देत नाही, अयोग्य सल्ला देत असल्याने त्यांच्या पक्षाची हानी या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात होत असल्याची टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा संपूर्णपणे अधिकार अजित पवार यांचा आहे. अजित पवार यांनी चेंडू धनंजय मुंडे यांच्या पोटात टाकला आहे. अजितदादा म्हणाले की माझ्यावर आरोप झाले त्यावेळी मी राजीनामा दिला होता. याचा अर्थ धनंजय मुंडे यांनी समजून घेऊन राजीनामा द्यावा. अजित पवार यांच्या भोवती असलेले कोंडाळे योग्य सल्ला देत नाही, अयोग्य सल्ला देत असल्याने त्यांच्या पक्षाची हानी या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात होत असल्याची टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. बारामतीमध्ये बोलताना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले.
वाल्मीक कराड हा 100 टक्के मास्टरमाइंड
सुरेश धस म्हणाले की, मी पहिल्या दिवसापासूनच या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मीक कराड असल्याचे सांगत आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले ही सगळे प्यादे आहेत, वापरून घेणारा तर वाल्मीक कराड आहे. वाल्मीक कराड हा 100 टक्के मास्टरमाइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. पोलिसांनी देखील आता वाल्मीक कराडचा सहभागावरती मोहोर लावली आहे. तिन्ही गुन्हे वाल्मी कराडवर लावले गेले आहेत. कलम 34 नुसार हे गुन्हे लावले गेले असल्याने वाल्मीक कराड हाच याचा मास्टरमाईंड असल्याचे सिद्ध झाल्याचे ते म्हणाले. वाल्मीक कराड हा साधा गुन्हेगार नाही. वाळू राख यामध्ये देखील वाल्मीक कराडचे लोक असल्याचे सुरेध धस म्हणाले.
परळीत येऊन फक्त शाई लावून जायचं, मतदान यांनीच करायचं
त्यांनी सांगितले की, निवडणुकीत देखील लोकांनी परळीत येऊन फक्त शाई लावून जायचं, मतदान यांनीच करायचं आजपर्यंत हेच घडले. या जगात फक्त पैसा सर्वश्रेष्ठ आहे हे वाल्मिक कराडने मानलं. भारत देशातील जेवढ्या अमानुष घटना झाल्या त्या सर्व घटना मागे सारेल, अशी घटना संतोष देशमुख यांच्याबद्दल झाली आणि क्रूरपणे हत्या करण्यात आली. कृष्णा आंधळे कदाचित राज्याबाहेर गेला असावा. कृष्णा आंधळे देखील सापडेल आणि सप्लिमेटरी चार्जमध्ये देखील अनेक जण सापडतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
दोन टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा असताना सातशे टक्के झाल्यावर काय करायचं?
बीडमध्ये बीडमध्ये सगळं अनबॅलन्स झालं आहे. आम्ही पहिल्यापासून सांगतोय की बिंदू नामावलीप्रमाणे बीडमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करा. दोन टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा असताना सातशे टक्के झाल्यावर काय करायचं? असा सवाल त्यांनी केला. खंडणी ॲट्रॉसिटी सर्व एक आहे, यामुळे काही चिंता करण्याची गरज नाही, आका आत गेले आहेत. पुरवणी आरोपपत्रात अजून अनेक लोकांची नावे येतील, देशमुख कुटुंबीयांची ही मागणी आहे. ज्यांची नावे येथील त्यांना वेगळा मोका लागला पाहिजे, वेगळा मोका लागून हे आत गेले पाहिजेत. भविष्यात कोणीही चुकीच्या लोकांना मदत करता कामा नये. अशांसाठी स्वतंत्र मोका लावावा ही आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
