शेतकरी मारहाण प्रकरण! पोलिसांची आणि निजामाची कार्यपद्धती यात बदल काय? कैलास पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, फडणवीसांना उत्तर द्यावं लागेल

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात खासगी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांकडून शेतकऱ्यांना मारहाण झाली होती. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

Continues below advertisement

Kailash Patil :  धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात खासगी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांकडून शेतकऱ्यांना मारहाण झाली होती. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पोलिसांची आणि निजामांची कार्यपद्धती यात फरक काय? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (Kailash Patil) यांनी पोलिसांवर टीका केली. शेतकऱ्यांना मारहाण करुन, त्यांना डांबून ठेवलं जात आहे. पोलीस नेमकं कुणासाठी काम करत आहेत? असा सवालही कैलास पाटील यांनी केला. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावं लागेल असेही पाटील म्हणाले. 

Continues below advertisement

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आक्रमक

धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात खासगी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांकडून शेतकऱ्यांना मारहाण झाली होती. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील हा अमानुष प्रकार असल्याचे समोर आले होते. पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा अन्यथा काम थांबवा, असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याची घटना घडली. या घटनेवरुन कैलास पाटील आक्रमक झाले आहेत.  

मराठवाड्यात आणि धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीचा विषय गंभीर

मराठवाड्यात आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीचा विषय गंभीर होत आहे. आज समोर आलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. एकाच शिवारात दोन कंपन्यांनी पवनचक्की उभ्या केल्या आहेत. एका कंपनीने जो मावेजा दिला आहे, किमान तितका तरी द्यावा, अशी मागणी तांदुळवाडी येथील गणेश शेरकर यांनी केली. मात्र, पोलिसांनी त्यांनाच मारहाण केली आहे. शेरकर यांच्या शेतीतील उसाने त्यांनाच पोलिसांनी मारले आहे. हे सरकार सामान्यांचे आहे की कंपन्याचे, हेच कळायला मार्ग नाही. ज्यांनी मार खाल्ला ते शेतकरी पोलिसांच्या ताब्यात आहेत, अशी माहिती आहे. असे जर असेल तर हे अतिगंभीर आहे. संबंधित शेतकऱ्यास न्याय मिळेपर्यंत आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे मत कैलास पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Kailas Patil : शेरकर यांच्या शेतीतील उसानं त्यांनाच पोलिसांनी मारलं, पोलीस काम कुणासाठी करतात? : कैलास पाटील

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »