एक तर तू राहशील नाहीतर मी, उद्धव ठाकरेंचं वाक्य आमच्या जिव्हारी, मुंबई मनपात वचपा काढणार, भाजपने रणशिंग फुंकलं

एकतर तू राहशील नाहीतर मी राहील, हे उद्धव ठाकरेंचे वाक्य अख्ख्या भारतीय जनता पक्षाच्या जिव्हारी लागलं असल्याचे मत भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केले.

Continues below advertisement

Ashish Shelar on Uddhav Thackeray :  एकतर तू राहशील नाहीतर मी राहील, हे उद्धव ठाकरेंचे वाक्य अख्ख्या भारतीय जनता पक्षाच्या जिव्हारी लागलं असल्याचे मत भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केले. आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते याचं भान सुटलेला नेता बेभान नेता म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असल्याची टीका शेलार यांनी केली. उद्धव ठाकरे गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले होते की, देवेंद्र एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, यावरुन शेलारांनी ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवलं आहे की, भाजप आणि देवेंद्रजी कुठे आहेत. उद्धव ठाकरे कुठे राहिले? असा सवाल शेलारांनी केला.  

Continues below advertisement

मुंबई महापालिका निवडणूक महायुतीत लढणार आणि जिंकणारही

एकतर तू राहशील नाहीतर मी राहील, हे उद्धव ठाकरेंचे वाक्य भाजपच्या जिव्हारी लागले आहे. मुंबईकर या निवडणुकीत दाखवतील उद्धवजी तुम्ही कुठे असाल? असा सवाल शेलारांनी केला. तुम्ही जी पोपटपंची केली त्याचे उत्तर मिळेल असंही शेलार म्हणाले. मुंबई महापालिका निवडणूक महायुतीत आम्ही लढणार आहोत आणि जिंकणारही आहोत असा विश्वास शेलारांनी व्यक्त केला. 50 पेक्षा कमी जागा महाविकास आघाडीला मुंबई महापालिका निवडणुकीत मिळणार असल्याचे शेलार म्हणाले. 

रोज बडबड करणाऱ्या उबाठा गटाच्या नेत्यांना मुंबईशी काही घेणेदेणे नाही

मुंबईकरांचा सेवेकरी कोण? याच मुद्द्यावर मुंबई महापालिका निवडणूक होणार आणि महायुती जिंकणार असल्याचे शेलार म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुका येऊ घातल्यात. तारीख कळेल, भाजपा मागील दीड वर्षापासून तयारी करत असल्याचे शेलार म्हणाले. मतदारांचा मतदानापुरता विचार करणे हे भाजपचे धोरण नाही. मी मुंबईभर फिरतोय आणि ज्या प्रकारे मला दिसतंय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईकडे पाठ दाखवली आहे. रोज बडबड करणाऱ्या उबाठा नेत्यांना मुंबईशी काही घेणेदेणे नसल्याची टीका शेलारांनी केली. ते नाल्यांवर रस्त्यांवर कुठेही दिसत नाही. ते फक्त टीव्हीवर दिसतात. टीव्हीवर दिसून मतं मिळतात हा गैरसमज आहे असल्याटी टीका शेलारांनी ठाकरेंवर केली.  

छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी मिळून ठरवला

छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय तिन्ही पक्षाने मिळून ठरवला आहे. तिन्ही पक्षाचे नेते आमचा विचारपूर्वक निर्णय करतात असे शेलार म्हणाले. आमच्यावर टीका करणारे घरात बसून आहेत. त्यांनी रस्त्यावर यावं. जनतेचे त्यांच्याबद्दल काय भावना आहेत त्या समजून घ्याव्यात. त्यानंतर त्यांना त्यांचे स्थान कळेल असेही शेलार म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Uddhav Thackeray: आमचं जहाज बुडणार नाही, भाजप ओव्हरलोड झालाय, बुडण्याची भीती त्यांनाच: उद्धव ठाकरे

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »