पाकिस्तान संकटात! बिलावल भुट्टोचा थयथयाट, भारताला दिली अणुयुद्धाची धमकी
पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अणुयुद्धाची धमकी दिली आहे. माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी ही धमकी दिली आहे.

Indus Water Treaty : 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलेली होती. यामध्ये व्यापार बंदीसह सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला होता. या निर्णयाचा पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे. सातत्यानं पाकिस्तानकडून विविध प्रकारची वक्तव्य होत आहेत. अशातच पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अणुयुद्धाची धमकी दिली आहे. माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनी सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयावर अणुयुद्धाची धमकी दिली आहे.
बिलावल भुट्टो झरदारी सध्या अमेरिकेत आहेत. गुरुवारी (5 जून 2025) त्यांनी वॉशिंग्टनमधील मध्य पूर्व संस्थेत पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. सिंधू पाणी कराराचे उल्लंघन करुन भारत पाकिस्तानच्या जलसंपत्तीचा नाश करत आहे. पाण्यावरुन पहिल्या अणुयुद्धाचा पाया रचला जात आहे असे ते म्हणाले.
आमचा पाणीपुरवठा खंडित करणे हे युद्धाचे कृत्य
पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनच्या वृत्तानुसार, बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले, की आम्ही जाहीर केले आहे की आमचा पाणीपुरवठा खंडित करणे हे युद्धाचे कृत्य असेल. आम्ही हे राष्ट्रवाद म्हणून म्हणत नाही आहोत. आम्ही हे गोष्टी मौजमजेसाठी बोलत नाही आहोत, हे आमच्यासाठी अस्तित्वाचे संकट आहे. पृथ्वीवरील कोणताही देश, त्याचा आकार, त्याची ताकद किंवा क्षमता काहीही असो, तो आपल्या अस्तित्वासाठी आणि आपल्या पाण्यासाठी लढेल असे ते म्हणाले.
सकारात्मक चर्चा करायची असेल तर भारतानं सिंधू पाणी कराराबाबतचा निर्णय मागे घ्यावा
बिलावल म्हणाले की, भारताने सिंधू पाणी कराराचे पालन करावे आणि अमेरिका आणि इतर देशांनी या कराराचे उल्लंघन करण्यापासून भारताला रोखण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी. जर शांततेसाठी आपल्या चर्चा आणि राजनैतिक कूटनीति यशस्वी व्हायच्या असतील, जर भारताला पाकिस्तानशी सकारात्मक चर्चा करायची असेल, नवीन करार करायचे असतील तर प्रथम जुन्या करारांचे पालन करावे लागेल. भारताला सिंधू पाणी कराराबाबतचा आपला निर्णय मागे घ्यावा लागेल असे मत बिलावल यांनी व्यक्त केले.
दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला
बिलावल भुट्टो म्हणाले की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आणि त्या बदल्यात पाकिस्तानने शिमला करारासह भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा अधिकार वापरण्याचा निर्णय घेतला. यामुळं अटारी-वाघा सीमा बंद करण्याची आणि भारतासोबतचा सर्व व्यापार स्थगित करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
1960 मध्ये, जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी झाली, ज्यामध्ये भारताला पूर्वेकडील नद्यांचे (रावी, बियास, सतलज) पाणी मिळाले आणि पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्यांचे (सिंधू, झेलम, चिनाब) पाणी मिळाले. परंतु पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली, ज्यामध्ये हा करार स्थगित करणे देखील समाविष्ट होते.
महत्वाच्या बातम्या:
पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या, 24 कोटी लोकांचे जीवन धोक्यात, संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकची ओरड, भारताचं सडेतोड उत्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

