एक्स्प्लोर

India Pakistan War: भारत-पाकिस्तान युद्ध झालं तर देशातील कोणत्या राज्यांना सर्वाधिक धोका, मुंबईचं काय?

Operation Sindoor by Indian Army: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करुन दहशतवादी तळ बेचिराख केले होते.

Operation Sindoor Air strike: भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला होता. या मोहीमेला ऑपरेशन सिंदूर (Opearation Sindoor) असे नाव देण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये  भारताच्या लढाऊ विमानांमधून डागण्यात आलेल्या संहारक क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानमधील (Pakistan) नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 'खून की हर बूंद का बदला लेंगे', असे म्हणत पाकिस्तानी लष्कराला कारवाईसाठी संपूर्ण मोकळीक दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून भारतावर कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानने 'ऑपरेशन सिंदूर' प्रमाणे भारतावर एअर स्ट्राईक केला तर देशातील कोणत्या राज्यांना सर्वाधिक धोका असू शकतो, याची सध्या चाचपणी सुरु आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर सर्वाधिक नुकसान हे साहजिकच नियंत्रण रेषेला लागून असलेल्या परिसरात होईल. त्यामुळे भारत-पाक सीमारेषेपासून जवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉकड्रील सुरु झाली आहे. या राज्यांमधील लोकांना हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. भारतात सीमारेषेपासून जवळ असलेल्या राज्यांचा विचार करायला झाल्यास त्यामध्ये पंजाब, जम्मू-काश्मीर, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून हवाई हल्ला झाल्यास या राज्यांना सर्वाधिक धोका असू शकतो. यापूर्वी झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात या राज्यांना सर्वाधिक धोका असल्याचे दिसून आले होते. भारतातील उर्वरित राज्य आणि शहरं म्हणजे दिल्ली, मुंबई, पुणे ही सीमारेषेपासून बऱ्याच अंतरावर आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हवाई हल्ला होण्याची शक्यता तुलनेने कमी आहे.

तर पाकिस्तानलाही त्यांचे लष्करी तळ असलेल्या भागांमध्ये भारताच्या हल्ल्यापासून सर्वाधिक धोका आहे. उद्या यु्द्ध झाले तर भारतीय लष्कराकडून सीमारेषेलगत असणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचे तळ उद्ध्वस्त केले जातील. पाकिस्तानी लष्कराचे सर्वाधिक तळ हे पीओके आणि पंजाब प्रांतात आहेत. त्यामुळे हा परिसर युद्धप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार की नाही, यादृष्टीने पुढील काही तास महत्त्वाचे मानले जात आहेत. पाकिस्तानी सैन्याने सीमावर्ती भागात हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर कमालीचे सावध आहे.

आणखी वाचा

अख्खं जग भारताच्या बाजूने, पण 'हे' तीन मुस्लीम देश पाकिस्तानला देतायत युद्धासाठी चिथावणी

भारताच्या 80 विमानांनी आमच्यावर हल्ला चढवला, 'खून की हर बूंद का बदला लेंगे; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची दर्पोक्ती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
इंद्रायणीसारखीच दुर्घटना घडण्याची भीती; वैनगंगा नदीवरील खचलेल्या पुलावरुन जीव मुठीत धरुन प्रवास
इंद्रायणीसारखीच दुर्घटना घडण्याची भीती; वैनगंगा नदीवरील खचलेल्या पुलावरुन जीव मुठीत धरुन प्रवास
Bharat Gogawale vs Anand Paranjpe: राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
Mumbai Metro News: मोठी बातमी: घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प, तीन-चार तास वाहतूक बंद राहणार?
घाटकोपर-वर्सोवा मेट्रोची वाहतूक पूर्ववत, ओव्हरहेड वायवरील ताडपत्री हटवली, प्रवाशांना दिलासा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात समुद्राला उधाण,किनाऱ्यावर ती तीन ते साडेतीन मीटर उंचीच्या लाटा ABP MAJHAIndrayani River Bridge Collapse : कुंडमळा पूल दुर्घटनेचा धडकी भरवणारा 'तो' फोटो समोर ABP MAJHABachchu Kadu : माजी आमदार बच्चू कडूंना मोठा दणका,अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्Sanjay Raut Full PC :नाकाने कांदे सोलणारे,तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे फिरताय?राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
इंद्रायणीसारखीच दुर्घटना घडण्याची भीती; वैनगंगा नदीवरील खचलेल्या पुलावरुन जीव मुठीत धरुन प्रवास
इंद्रायणीसारखीच दुर्घटना घडण्याची भीती; वैनगंगा नदीवरील खचलेल्या पुलावरुन जीव मुठीत धरुन प्रवास
Bharat Gogawale vs Anand Paranjpe: राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
Mumbai Metro News: मोठी बातमी: घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प, तीन-चार तास वाहतूक बंद राहणार?
घाटकोपर-वर्सोवा मेट्रोची वाहतूक पूर्ववत, ओव्हरहेड वायवरील ताडपत्री हटवली, प्रवाशांना दिलासा
Pakistan Vs Israel Army: पाकिस्तान आणि इस्रायलचं युद्ध झालं तर कोण जिंकेल? दोन्ही देशांकडे कोणकोणती संहारक अस्त्रं?
पाकिस्तान आणि इस्रायलचं युद्ध झालं तर कोण जिंकेल? दोन्ही देशांकडे कोणकोणती संहारक अस्त्रं?
विखे-पाटील नव्हे हे तर विकले गेलेले पाटील, सत्तेसाठी इतकी चाटूगिरी करू नये; 'ते' पुस्तक दाखवत राधाकृष्ण विखेंवर प्रहारचा जोरदार पलटवार
विखे-पाटील नव्हे हे तर विकले गेलेले पाटील, सत्तेसाठी इतकी चाटूगिरी करू नये; 'ते' पुस्तक दाखवत राधाकृष्ण विखेंवर प्रहारचा जोरदार पलटवार
मोठी बातमी: केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणेची अधिसूचना जारी; जाणून घ्या सर्वेक्षणाबाबत या 10 महत्त्वाच्या गोष्टी
मोठी बातमी: केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणेची अधिसूचना जारी; जाणून घ्या सर्वेक्षणाबाबत या 10 महत्त्वाच्या गोष्टी
Kolhapur Weather Update: कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी तासात दोन फुटांनी वाढली; करुळ घाटात दरड कोसळली, राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला
कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी तासात दोन फुटांनी वाढली; करुळ घाटात दरड कोसळली, राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला
Embed widget
OSZAR »