ट्रेंडिंग
3 तासातच पाकिस्तानने दाखवले खरे रंग, शस्त्रसंधीचं उल्लंघन, ड्रोन हल्ल्यासह गोळीबार सुरु, भारताचं चोख प्रत्युत्तर
अवघ्या तीनच तासात पाकिस्तानने त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. युद्धबंदीची घोषणा केल्यानंतरही पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे.
India Pakistan war : अवघ्या तीनच तासात पाकिस्तानने त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. युद्धबंदीची घोषणा केल्यानंतरही पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. तसेच काही ठिकाणी पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये स्फोटांचा आवाज ऐकायला मिळत आहे. उधमपूरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरसर राजस्थानच्या जैसलमेर, बाडमेरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु करण्यात आला आहे. भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. कच्छमधील सीमावर्ती भागातही पाकिस्तानचे ड्रोन दिसले आहे. श्रीनगरमध्ये स्फोटांचा आवाज आल्याची माहिती मिळाली आहे. बारमेरमध्ये एकामागोमाग ड्रोन दिसले आहेत. सीमावर्ती अनेक भागांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने 11 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. आत्तापर्यंत 9 शहरांमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसल्याची माहिती मिळत आहे. गुजरातच्या कच्छमध्ये देखील पाकिस्तानचे ड्रोन दिसले आहे. भारतीय सैन्य दलाने हे सगळे ड्रोन पाडले आहेत. या घटनेनंतर शस्त्रसंधीचं काय झालं? असा सवाल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.
युद्धबंदीच्या घोषणेनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारत पाकिस्तान युद्धबंदीसंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर भारत सरकारने देखील अधिकृतपणे याबाबतची घोषणा केली होती. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मी आनंदाने जाहीर करतो की भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन! या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून 3.35 वाजता अधिकृपणे फोन आल्यानंतरच भारताने शस्त्रसंधी निर्णयाची घोषणा केली आहे. त्यामुळे, पाकिस्तान नरमल्यानंतर भारताकडून अधिकृतपणे युद्धविरामची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओंचा भारताच्या डीजीएमओंना 15.35 वाजता फोन आला. दोन्ही बाजूंकडून फायरिंग, लष्करी कारवाया, हवाई आणि सागरावरुन होणाऱ्या कारवाया आज 5 वाजल्यापासून थांबवल्या जातील. डीजीएमओ 12 मे रोजी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील असे सांगिलते होते. मात्र, पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत देशातील काही भागात गोळाबीर केला आहे. तसेच ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान, भारताचे सगळे लष्करी तळ, युद्धसामग्री सुस्थितीत : कर्नल सोफिया कुरेशी